रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्यांच्या लग्नानंतर ते अगदी आलिया गरोदर असल्याची बातमी जाहीर होताच हे दोघे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. नुकतंच दोघे एका लाईव्ह सेशनमध्ये दिसले. या सेशनची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. या सेशन दरम्यान चाहत्यांनी दोघांच्या आगामी येणाऱ्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले त्याची उत्तरे देखील त्यांनी दिली.

एका चाहत्याने त्यांच्या चित्रपटातील शिव आणि ईशा या पात्राबद्दल विचारले, तसेच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? यावर रणबीर कपूरने उत्तर दिले की, ‘मला वाटतं जेव्हा शिवाने ईशाला पाहिलं ते माझ्यासाठी खूप सोपं होतं कारण जस रणबीरने आलियाला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला त्याच पद्धतीने शिवा ईशाला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला’. पहिल्या नजरेतील ते प्रेम आहे. हे ऐकताच लाजून आलियाने रणबीरला विचारले खरंच का? यावर रणबीरने होकार दर्शवला, यावर आलियाने हसून रणबीरच्या खांद्यावर डोके ठेवले.

गरोदर आलियाची खिल्ली उडवणाऱ्या रणबीरला नेटकऱ्यांनी सुनावलं; पाहा नेमकं काय घडलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चं सगळीकडे शूटिंग का करत नाहीये याचं कारण सांगताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर म्हणतो, “या चित्रपटाची घोषणा जवळपास ४ वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहिती आहे.” रणबीर बोलत असतानाच मध्येच आलिया म्हणते, “आम्ही प्रमोशन करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी जाणार आहोत. पण प्रश्न हा आहे की आम्ही सगळीकडे का गेलेलो नाही. (हम हर जगह फैले क्यों नहीं हैं?)” आलियाच्या या बोलण्यावर रणबीरनं तिची खिल्ली उडवली. तो जे म्हणाला ते ऐकल्यावर सर्वच हैराण झाले आहेत.

रणबीर कपूर आलियाच्या बेबी बंपकडे पाहत म्हणाला, “अशी एक व्यक्ती आहे जी पसरली आहे. (वैसे कोई है जो फैल गया है)” रणबीरचं हे बोलणं ऐकून आलियाही त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. अर्थात रणबीरने आलियाला हे मस्करीत म्हटलं असलं तरीही नेटकऱ्यांना मात्र त्याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. आलियाच्या गरोदरपणा आणि वाढलेल्या वजनाची अशा प्रकारे खिल्ली उडवलेली पाहून युजर्सनी रणबीर कपूरला चांगलंच सुनावलं.

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.