सुखद थंडीत गणपतरावांनी सहकुटुंब गावाला जायचे ठरवले. पण ऐन प्रभात रोडवरचा आपला बंगला सुरक्षित राहील ना, याची त्यांना प्रचंड काळजी होती. एका पाटीने त्यांची ही चिंता दूर केली. त्यांनी लिहिले- 'बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहीही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये!' 05