मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी ५० किमी अशी वेगमर्यादा होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून बोरघाटात ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी दोन दिवसांपासून सुरु झाली आहे. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग ९४ किमीचा असून या महामार्गावर प्रवास करताना हलक्या वाहनांना समतल भागात ताशी १०० किमी अशी वेगमर्यादा होती. तर ३५ ते ५२ किमीच्या बोरघाटात ताशी ५० किमी अशी वेगमर्यादा होती. अशावेळी समतल भागातून ताशी १०० किमी वेगाने येणाऱ्या वाहनांना बोरघाटात येताना ताशी ५० किमी वेग करणे अडचणींचे ठरत होते. त्यामुळे अपघातही होत होते.

हेही वाचा : Malegaon Blast Case : “२५ एप्रिलला हजर रहा, अन्यथा..”, न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काय सांगितलं?

Western Railway block
Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा ब्लॉक
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Traffic movement after debris clear on vani ghat
वणी घाटातील दरड हटवून मार्ग मोकळा
Traffic jam due to road works in Mankhurd T Junction area
दोन मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास, मानखुर्द टी जंक्शन परिसरातील रस्ते कामांचा फटका
Question mark on stealth traffic after accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातानंतर चोरट्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह
A high speed highway from Igatpuri to wadhwan Port will be constructed to connect the wadhwan Port to the Samriddhi Highway
समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराला जोडणार… कसा असेल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प?
Fast and traffic free travel from Vadape to Thane from May 2025 onwards
वडपे ते ठाणे जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास मे २०२५ पासून
Traffic stopped for 15 hours after truck overturned at Vasai Phata
ठाणे जिल्ह्याची चौफेर कोंडी; वसई फाट्यावर ट्रक उलटल्याने १५ तास वाहतूक ठप्प

ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांनी एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार बोरघाटातील वेगमर्यादा बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. या प्रस्तावाच्या अनुषंगाने १५ एप्रिलला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी),परिवहन विभाग, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र आणि इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत एकमताने बोरघाटातील वेगमर्यादा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता महामार्गावर हलक्या वाहनांना समतल भागात ताशी १०० किमी तर बोरघाटात ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून ही नवीन वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.