भंडारा : अखेर गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ पैकी ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले गेले आहे. संपूर्ण ३३ दारातून ३७३४.४२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला अरेंज अलर्ट दिला असून मागील २४ तासांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी वरून वाहत आहेत. समतल भागात पाणी साचत असून लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेले आहे.

या मोसमात पहिल्यांदाच गोसेचे ३३ ही दरवाजे उघडले गेले आहेत. मागील २४ तासात संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने तसेच गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत होती, त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित आणण्यासाठी गोसीखुर्द धरण प्रशासनाने संपूर्ण ३३ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला धरणात येणाऱ्या पावसाचा प्रवाह लक्षात घेऊन दार उघडण्याचे प्रमाण कमी जास्त केले जात आहे.

हेही वाचा >>>हवामान खात्याने दिला ‘या’ राज्यांना पुराचा इशारा

हेही वाचा >>>नागपूर: मंदिर वस्त्रसंहिता लागू करणे मंदिर व्यवस्थापनाला अडचणीचे, जाणून घ्या कारणे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असल्याने मासेमार बांधवाना नदी पात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय नदी काठावरील गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. आता पर्यंत भंडारा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून या तालुक्यात ८८ टक्के पाऊस पडला आहे सध्या वैनगंगेच्या कारधा नदीपत्राची पाणी पातळी २४३. ३२ मीटर असून धोक्याची पातळी २४५ मीटर एवढी आहे.