लोकसत्ता टीम

नागपूर: पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे २०१८ मध्ये दंगल झाली होती. याप्रकरणी आयोगासमोर चौकशी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवावे,अशी विनंती आयोगाकडे केली आहे. त्यावर मंगळवारी नागपूरमध्ये रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार

प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस सोबतच २०१८ साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे, अशी विनंती आयोगाला लिहलेल्या पत्राद्वारे केली आहे.

आणखी वाचा- वाशिम: रात्री १ वाजता येणारी मुंबई एक्सप्रेस पोहचली ३ वाजता; प्रवाशांना मन:स्ताप

यासंदर्भात पत्रकारांशी विचारणा केली असता रामदास आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी सूचना केली असली तरी कोणाला चौकशीसाठी बोलावावे हा अधिकार आयोगाचा आहे. पण जर आयोगाने फडणवीस यांना बोलावले तर ते नक्कीच जातील. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांनी संपूर्ण राज्यात शांतता ठेवण्याचे काम केले.