नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारी बाबात घेण्यात आलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाने आकडेवारी सह प्रमाण दिले आहे. पण, काँग्रेस नेते राहुल गांधींनाना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. ते खोटे बोलून स्वतःच्या मनाला समजावत आहे. जोपर्यंत हे सत्य स्वीकारून जागे होऊन जमिनीवर काम करणार नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलाही भवितव्य उरलेले नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दैनिक लोकसत्ता मध्ये शनिवारी प्रकाशित राहुल गांधी यांच्या लेखावर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मत घोटाळ्यावर भाष्य केले होते. ते आज विदर्भ पाणी परिषदेसाठी नागपुरात आले होते.
राहुल गांधी यांच्या लेखाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे. तर, पण राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाही. स्वतःशीच खोट बोलणे सोडणार नाही, खोटे आश्वासनाने दिलासा देण्याचे सोडणार नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही, त्यांना जागे व्हावे लागेल, वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल. अशा पद्धतीने खोटं ते नेहमी बोलत असतात मतदारांचा अपमान करत असतात. राहुल गांधीने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला आहे. राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसते ऐकणाऱ्या समजत नाही.
रोज खोटे बोलले की लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात. यापूर्वी देखील त्यांनी असा आरोप केलेला आहे. निवडणूक आयोगाने आकडेवारी सह प्रमाण दिले. रोज खोटे बोलण्याची सवय राहुल गांधी यांना लागलेली आहे. राहुल गांधी खोटे बोलून स्वतःच्या मनाला समजावत आहेत. ते जोपर्यंत हे सत्य स्वीकारून जागे होऊन जमिनीवर काम करणार नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलाही भवितव्य उरलेले नाही. स्वतःशी खोटे बोलून स्वतःला दिलासा देण्याचा काम राहुल गांधी करत आहे. आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान राहुल गांधी करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
उत्कटता माध्यमात
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांना ऊधान आले आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले. दोन्ही भावाच्या युतीवर रोज काय बोलणार आहे. मी कालच बोललो. जेवढी उत्कटता या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल माध्यमांमध्ये दिसत आहे. तेवढी दोन्ही भावांमध्ये दिसत नाही आहे.