नागपूर : ‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट असून पोलीस विभाग आणि बँकांनी आतातरी गांभीर्य दाखवावे. कुणाची सायबर फसवणूक झाल्यानंतर पोलीस आणि बँक सरळ हात झटकून मोकळे होतात. अनेकांच्या खात्यातून दिवसाला कोट्यवधी रुपये सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळते होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी स्वतःच सतर्क होण्याची गरज निर्माण झाली, असे प्रतिपादन अॅड. महेंद्र लिमये यांनी केले. ते जनमंचतर्फे श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मनोहर रडके तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल जावळकर, प्रल्हाद करसने उपस्थित होते.

अॅड. लिमये म्हणाले, की इंटरनेट आणि विविध अॅपच्या माध्यमातून भ्रमणध्वनीमध्ये आपण गुप्तहेर पोसत आहेत. आपल्या भ्रमणध्वनीत अनेक प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्यात येतात आणि आपण कोणतीही सूचना न वाचता थेट परवानगी देतो. त्यामुळे आपल्या भ्रमणध्वनीच्या मार्फत आपल्या आवाजापासून ते आवडनिवडीपर्यंतची सर्व माहिती वापरण्याची मुभा देतो. वॉट्सअप, फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून प्रत्येक जण आपली खासगी माहिती देत असतो. याच कंपन्या इंटरनेट किंवा अॅप्स निःशुल्क देऊन आपला डेटा सायबर गुन्हेगारांना पुरवतात. आपल्या भ्रमणध्वनीमुळे आता कोणतीही गुप्तता राहिली नाही. बँकेत किती पैसे आहेत किंवा कधी, कुणाला किती पैसे पाठवले याचाही हिशेब गुगल-फेसबुक-वॉट्सअपकडे असतो. फुकटेगिरीमुळे अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. ‘डिजीटल अरेस्ट’च्या माध्यमातून उच्चशिक्षित नागरिकसुद्धा फसल्या गेले आहेत. जवळपास १२०० कोटी रुपयांची फसवणूक डिजीटल अरेस्टच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी केली आहे. आपल्या खात्यातून एका ‘क्लिक’वर पैसे गुन्हेगारांच्या खात्यात वळते होतात. मात्र, बँक कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही. सायबर गुन्हेगारांनी एखाद्या मोठ्या व्यक्तीचे पैसे उकळले तर ते पोलीस आटापीटा करुन सायबर गुन्हेगारांच्या घशातून पैसे परत आणतात. परंतु, सामान्य व्यक्तींच्या खात्यातून पैसे गेल्यास पोलीस गांभीर्य दाखवत नाहीत, असा आरोपही अ’ड. लिमये यांनी केला.

India aims to be FMD free by 2030
पाच वर्षांत देश ‘एफएमडी’ मुक्त करण्याचा संंकल्प, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांची माहिती
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
Mamata Banerjee Abhishek Banerjee cold war
TMC : तृणमूल काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? ममता बॅनर्जी आणि अभिषेक यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ चर्चेत
cyber crime
सायबर सुरक्षाकवच

हेही वाचा…विधान परिषदेसाठी सोलापुरात, महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा

u

१२८ देशांत डेटा प्रोटेक्शन अॅक्ट

जगातील दोनशे देशापैकी जवळपास १२८ देशांनी डाटा प्रोटेक्शन अ‍ॅक्ट तयार केला. यात पाकिस्तानसह, श्रीलंका, बांग्लादेशचा समावेश आहे. मात्र, भारतासारख्या बलाढ्य देशात अजूनही हा कायदा अंमलात आणला नाही. त्यासाठी महामंडळाचे गठनही झाले नाही. त्यामुळे वयक्तिक माहिती असुरक्षित आहे, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. संचालन जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी केले.

Story img Loader