नागपूर : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच केला जातो. परंतु, राज्यात दर दिवसाला ३४ बाळ मातेच्या गर्भातच दगावत आहेत. याशिवाय प्रत्येक आठ तासांत एक मातामृत्यू होत आहे. ही धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून पुढे आली आहे.

हेही वाचा : खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात, “पूर्वी मुख्यमंत्र्यांचे ‘दूर’दर्शन, आता मात्र…”

supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
missing women, High Court, State Govt,
बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का ? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, पोलिसांना विचारणा
bank deduct penalties from ladki bahin yojana installment for not keeping minimum balance in savings account
‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यातून बँकांची वसुली; नियमानुसार शिल्लक न ठेवल्यामुळे रक्कमेत कपात झाल्याच्या तक्रारी
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
Nagpur, police sub inspector promotions, Ministry of Home Affairs, Independence Day, promotion process, Mumbai, Pune, Nashik, constable promotion,
राज्यातील ५०० पोलीस उपनिरीक्षकांच्या खांद्यावर लागला ‘तिसरा स्टार’
State board, fee refunds, fee,
राज्य मंडळाच्या शुल्क परताव्याला तांत्रिक अडचणींचा फटका… झाले काय?

या तपशिलानुसार, राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान २२ हजार ९८ उपजत मृत्यू (कमी वजनाच्या बाळाचे गर्भातच झालेले मृत्यू) झाले. याच काळात २ हजार ६४ मातामृत्यू नोंदवण्यात आले. या आकडेवारीची दिवसाची सरासरी काढल्यास राज्यात सुमारे ३४ उपजत मृत्यू तर ३ मातामृत्यू होत आहेत. राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान १३ हजार ६३५ उपजत मृत्यू तर १ हजार २१७ मातामृत्यू नोंदवले गेले. तर १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान ८ हजार ४६३ उपजत मृत्यू तर ८४७ मातामृत्यू नोंदवले गेले. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणले आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे कार्यालयाने या आकडेवारीला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : अभिनेत्री सायली संजीव म्हणते, मला शेतकरी नवरा हवा…

राज्यातील माता मृत्यूची स्थिती

कालावधीमाता मृत्यू
एप्रिल २२ ते मार्च २०२३२१७
एप्रिल २३ ते डिसेंबर २०२३८४७
एकूण२,०६४

राज्यातील उपजत बालमृत्यूची स्थिती

कालावधीउपजत मृत्यू
एप्रिल २२ ते मार्च २०२३१३,६३५
एप्रिल २३ ते डिसेंबर २०२३८,४६३
एकूण२२,०९८

गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

“अर्भकाची विकलांगता, रक्ताची कमी, विविध संक्रमण, अपघातासह इतरही कारणांमुळे गर्भातच उपजत मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्रत्येक मातेने गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा तंतोतंत पालन केल्यास उपजत व माता मृत्यूही कमी होऊ शकतात. त्यासोबतच प्रत्येक प्रसूती रुग्णालयात होणेही आवश्यक आहे.” – डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ, नागपूर.