नागपूर : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच केला जातो. परंतु, राज्यात दर दिवसाला ३४ बाळ मातेच्या गर्भातच दगावत आहेत. याशिवाय प्रत्येक आठ तासांत एक मातामृत्यू होत आहे. ही धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून पुढे आली आहे.

हेही वाचा : खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात, “पूर्वी मुख्यमंत्र्यांचे ‘दूर’दर्शन, आता मात्र…”

1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Maharashtra sexual harassment cases
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात मुंबई पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर
hirakani rooms , medical colleges,
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ७० कक्ष साकारणार
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

या तपशिलानुसार, राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान २२ हजार ९८ उपजत मृत्यू (कमी वजनाच्या बाळाचे गर्भातच झालेले मृत्यू) झाले. याच काळात २ हजार ६४ मातामृत्यू नोंदवण्यात आले. या आकडेवारीची दिवसाची सरासरी काढल्यास राज्यात सुमारे ३४ उपजत मृत्यू तर ३ मातामृत्यू होत आहेत. राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान १३ हजार ६३५ उपजत मृत्यू तर १ हजार २१७ मातामृत्यू नोंदवले गेले. तर १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान ८ हजार ४६३ उपजत मृत्यू तर ८४७ मातामृत्यू नोंदवले गेले. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणले आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे कार्यालयाने या आकडेवारीला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : अभिनेत्री सायली संजीव म्हणते, मला शेतकरी नवरा हवा…

राज्यातील माता मृत्यूची स्थिती

कालावधीमाता मृत्यू
एप्रिल २२ ते मार्च २०२३२१७
एप्रिल २३ ते डिसेंबर २०२३८४७
एकूण२,०६४

राज्यातील उपजत बालमृत्यूची स्थिती

कालावधीउपजत मृत्यू
एप्रिल २२ ते मार्च २०२३१३,६३५
एप्रिल २३ ते डिसेंबर २०२३८,४६३
एकूण२२,०९८

गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

“अर्भकाची विकलांगता, रक्ताची कमी, विविध संक्रमण, अपघातासह इतरही कारणांमुळे गर्भातच उपजत मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्रत्येक मातेने गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा तंतोतंत पालन केल्यास उपजत व माता मृत्यूही कमी होऊ शकतात. त्यासोबतच प्रत्येक प्रसूती रुग्णालयात होणेही आवश्यक आहे.” – डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ, नागपूर.

Story img Loader