नागपूरः कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात गुरुवारी शिंगाडा पिठाची पुरी आणि बटाटा भाजीचे सेवन केल्यावर २५ ते ३० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या सगळ्यांना तत्काळ नंदिनी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

कोराडी देवस्थानातील स्वयंपाकगृहात गुरुवारी कर्मचाऱ्यांसाठी शिंगाडा आणि राजगिराच्या पिठाची पुरी आणि बटाट्याची भाजी तयार केली होती. येथील कर्मचाऱ्यांसह इतर सुमारे २५ ते ३० जणांनी या खाद्यपदार्थांसह लाडूचेही सेवन केले. त्याच्या काही तासांनी सगळ्यांना अचानक ओकारी, थंडी, भोवळचा त्रास सुरू झाला. सगळ्यांची प्रकृती खालावत असल्याचे बघत तातडीने सगळ्यांना जवळच्या नंदिनी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे डॉक्टरांनी रुग्णांचा इतिहास घेत तातडीने सगळ्यांवर उपचार सुरू केले. येथील डॉक्टरांशी गुरुवारी रात्री ८ वाजता भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता आतापर्यंत सुमारे २६ रुग्ण उपचारासाठी आले असून आणखी रुग्ण येणे सुरू असून आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचाही डॉक्टरांचा दावा आहे.

Krishna River, Datta Mandir, audumbar,
सांगली : कृष्णेचा औदुंबरच्या दत्तमंदिरात शिरकाव, वारणाकाठी सतर्कतेचा इषारा
Nrusinhawadi, Dakshindwar,
कोल्हापूर : नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दुसरा दक्षिणद्वार सोहळा; भाविकांनी केले पवित्र स्नान
Akkalkot, guru purnima, devotees,
अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
husband, alcohol, wife murder husband,
पती दारू पिऊन द्यायचा त्रास, संतापलेल्या पत्नीने कोंबडी कापण्याची सुरी उचलली आणि…
yavatmal suicide marathi news
बुलढाणा: गूढ आत्महत्या! तरुण शेतकरी, सासुरवाडीतील रात्र, मंदिराच्या घंटीला भगवे वस्त्र…
katyayani temple Kolhapur
कोल्हापुरातील कात्यायनी मंदिरात पुन्हा चोरी
silver idols stolen from siddhanath temple thief arrested with the help of cctv
सिद्धनाथ मंदिरात चांदीच्या मूर्तींची चोरी, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला अटक
Demand for stone idols of Vitthal Rukmini
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दगडी मूर्तींना मागणी, पंढरपूरमधली बाजारपेठ सजली

हेही वाचा – विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा

नागपुरात गेल्या दीड महिन्यात सातत्याने विषबाधेचे प्रकरण घडत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहे. या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता अद्याप कसलीही तक्रार आली नसल्याचा दावा करण्यात आला.

हेही वाचा – विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…

”फराळातून अतिशय किरकोळ स्वरुपाची विषबाधा झाली. सर्वांवर आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपचार केले. सगळेच सुखरूप आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. काही कामावरही परतले आहेत.” – व्यवस्थापक, श्री. महालक्ष्मी जगदंबा मंदिर, कोराडी.