नागपूर : करोना काळात रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी प्रवास भाड्यातील सवलत बंद केली होती. ती अजूनही सुरू झालेली नाही. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असून गेल्या तीन वर्षांत १५ कोटींंहून अधिक ज्येष्ठ नारिकांनी पूर्ण तिकिटाच्या रूपात रेल्वेला कोट्यवधी रुपये अतिरिक्त दिले आहेत.

टाळेबंदीपूर्वी (२० मार्च २०२०) रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांपैकी महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के तर पुरुषांना ४० टक्के सवलत दिली जायची. परंतु, नंतर करोनाच्या नावाखाली रेल्वेने ही सवलत बंद केली. ती अद्यापही सुरू झालेली नाही. याचा फटका वयोवृद्ध, सेवानिवृत्तांना बसत आहे. गेल्या तीन वर्षांत १५ कोटी २६ लाख ५३ हजार ४२६ ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. त्यांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला. हा तपशील माहिती अधिकारातून समोर आला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत १५ कोटी २६ लाख ५३ हजार ४२६ ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण भाडे भरून रेल्वेचा प्रवास केला.

हेही वाचा – नागपूर : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी; फेसबुकवर ‘लाईव्ह’ करून तरुणाची आत्महत्या

हेही वाचा – नाना पटोले म्हणतात, “‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ला विरोध नाही, मात्र निवडणुका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अतिरिक्त वसुलीनंतरही प्रवासी सुविधा वाढलेल्या नाहीत. उलट शयनयान कमी केले जात आहेत आणि शयनयान डब्यात अनारक्षित तिकीटधारकांना प्रवेश दिला जात आहे. रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक यांची सवलत पूर्ववत करावी. – बसंतकुमार शुक्ला, अध्यक्ष, भारतीय प्रवासी यात्री केंद्र.