नाशिक : दम्याच्या आजारावर उपचारासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील राकेश अहिरे दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबईला गेले होते. रुग्णालयात उपचार घेऊन ते गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटीने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी निघाले होते. परंतु, नौदलाच्या स्पीडबोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. त्यांचा अहिरे कुटूंबातील तिघांचा समावेश आहे.

अहिरे यांचा पाच वर्षाचा मुलगा निधेश याला दम्याचा आजार होता. त्याच्यावर मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासाठी तिघे मुंबई येथे गेले होते. उपचारानंतर नाशिकला येण्याआधी राकेश अहिरे हे पत्नी हर्षदा यांच्या माहेरी थांबणार होते. त्याआधी गेटवे ऑफ इंडियाजवळ जल सफारीचा आनंद घेण्यासाठी बुधवारी अहिरे कुटूंब गेले.

Increase in the price of vegetables at the wholesale market in Shri Chhatrapati Shivaji Market Yard pune news
कोथिंबिर, अंबाडी, चुका, चवळईच्या दरात वाढ; बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
MLA Rohit Pawar experienced sorghum harvesting farm karjat jamkhed
आमदार रोहित पवार यांनी शेतामध्ये घेतला ज्वारी काढणीचा अनुभव
Leafy Vegetables Health Benefits| How much Leafy Vegetables to Eat
Leafy Vegetables Health Benefits: पालेभाज्या खाताना कोणती काळजी घ्याल?
Information about impact of union budget 2025 on agriculture in marathi
विश्लेषण : कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?
nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 

हेही वाचा…कांदा दर गडगडल्याने शेतकरी संतप्त

राकेश, हर्षदा आणि निधेश तिघेही बोटीत बसले. समुद्रात काही अंतर गेल्यानंतर त्या बोटीला नौदलाच्या स्पीडबोटने धडक दिली. या अपघातात अहिरे कुटूंबियांतील तिघांचा मृत्यू झाला. राकेश यांचा बुडून मृत्यू झाला. तर हर्षदा आणि निधेश यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा राकेश यांचे वडील नाना अहिरे आणि कुटूंबियांवर मोठा आघात झाला आहे. तीन दिवसांपूर्वी मुलगा, सून आणि नातवाची भेट अखेरची ठरल्याने अहिरे कुटूंबियांच्या भावना अनावर झाल्या.

Story img Loader