नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सकाळपासूनच असलेला पावसाचा जोर पाहता शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शहरातील इयत्ता बारावी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शहरात सकाळच्या सत्रातील शाळा सुरू असून दुपारच्या सत्रातील शाळांना मात्र सुट्टी मिळणार आहे. याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पत्रक जारी केले आहे.

हेही वाचा…ओएनजीसीतील भूमिपुत्र कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रकल्पग्रस्त नागाव, चाणजे आणि केगाव ग्रामपंचायतींची आक्रमक भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर सकाळच्या सत्रातल्या शाळा अर्ध्या दिवसानंतर सोडून देण्यातचे आदेश देण्यात आले आहेत – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका