– डॉ. यश वेलणकर

निद्रानाश या आजाराची दोन प्रकारची लक्षणे असतात. काही जणांना झोप लागत नाही; तर काहींना झोप लागते, पण ती सलग लागत नाही-सतत जाग येत राहते. झोप पुरेशी न झाल्याने थकवा, निरुत्साह जाणवत राहतो. तारुण्यात निद्रानाशाचे महत्त्वाचे कारण शारीरिक किंवा मानसिक वेदना हे असते. झोप लागत नाही याचीच चिंता वाटू लागते. झोप येण्यासाठी मनोमन बरेच प्रयत्न केले जातात, पण अशा प्रयत्नांनी झोप येत नाही. कारण विचार मनाला उत्तेजित ठेवतात. मन उत्तेजित असेल तर झोप येत नाही. अशावेळी प्रयत्न शैथिल्य आवश्यक असते. योगात प्रयत्न शैथिल्यात ‘अनंत समापत्ती’ असे सूत्र आहे. ते झोपेविषयीही खरे आहे.

With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
lok sabha elections 2024 bjp focus to perform well in lok sabha election in west bengal
Lok Sabha Elections 2024 : संदेशखालीचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार का ?
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

झोप आणण्याचे प्रयत्न सोडून दिले तर झोप येऊ शकते. हे शक्य होण्यासाठी साक्षीभावाचा सराव उपयुक्त ठरतो. झोप लागत नाही हीच चिंता किंवा अन्य कोणतीही चिंता या सरावाने कमी होते. त्यासाठी मनात चिंता आहे हे मान्य करायचे आणि लक्ष शरीरावर नेऊन संवेदना जाणायच्या, स्वीकारायच्या. त्यामुळे चिंता निर्माण करणारे विचार कमी होऊ लागतात. झोप लागेपर्यंत अशा संवेदना किंवा पोटाची श्वासामुळे होणारी हालचाल जाणत राहिली, तर नकळत निद्रादेवी प्रसन्न होते. ती झाली नाही तरी मनाला विश्रांती मिळत असल्याने झोप न मिळाल्याने होणारा त्रास कमी होतो. झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास प्रखर प्रकाश बंद करणे, टीव्ही/मोबाइल पाहणे बंद करणे आवश्यक असते. कारण झोप येण्यासाठी आवश्यक रसायने डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडत असेल तर तयार होत नाहीत. झोपायला जाण्यापूर्वी कोणतेही वादविवाद करायचे नाहीत अन्यथा तेच विचार मनाचा ताबा घेतात.

अष्टांग योगात धारणा, ध्यान याआधीची पायरी प्रत्याहार आहे. झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास हिचा अवलंब करायचा, म्हणजे ज्ञानेंद्रियांना कोणताही आहार द्यायचा नाही. काहीही पाहायचे नाही, ऐकायचे नाही, व्यायाम करायचा नाही. लक्ष श्वासावर, शरीरावर आणायचे. आज झोप लागेल की नाही-या मनात येणाऱ्या विचारालाही महत्त्व द्यायचे नाही. चिंता, तणाव कमी झाला की झोप लागतेच. ती लागत नसेल तर शरीराला झोपेची गरज नाही असे समजून त्याचाही स्वीकार करायचा. वार्धक्यात झोपेची वेळ निसर्गत: कमी होते. अशा वेळी मिळणाऱ्या काळाचे काय करायचे, हा प्रश्न असतो. झोपेची आसक्ती न ठेवता या वेळी करता येतील असे सर्जनशील उपक्रम शोधणे हेच यावरचे उत्तर आहे.

yashwel@gmail.com