पालघर : आगामी पावसाळा आणि परिणामी पूरपरिस्थिती इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे पालघर जिल्हयातील एक हजार ८५ रास्त भाव धान्य दुकानातून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका २५ किलो तांदुळ व १० किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी तीन किलो तांदुळ व दोन किलो गहू मोफत एकत्रित तीन महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार आहे.

आगामी पावसाळा आणि परिणामी पूरपरिस्थितीमुळे कार्यक्षम लॉजिस्टिक्स आणि साठवणुकीसाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्ट २०२५ पर्यंत एनएफसीए अंतर्गत वाटप केलेले अन्नधान्याची आगाऊ उचल करण्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. या अन्नधान्याची उचल व वाटप केलेले अन्नधान्याची उचल आणि वाटपाबाबतची कार्यवाही विहित कालमर्यादेत ३० जून २०२५ पर्यंत करण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हयातील एक हजार ८५ रास्त भाव धान्य दुकानातून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका २५ किलो तांदुळ व १० किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी तीन किलो तांदुळ व दोन किलो गहू मोफत एकत्रित तीन महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार आहे.

माहे जून, जुलै व ऑगस्ट २०२५ करीता रास्त भाव धान्य दुकानदारांच्या पॉस मशिनला धान्यसाठा एन्ट्री करण्यासाठी शाशकीय IAeSCM प्रणालीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून इपॉस मशीनवर जून २०२५, जुलै २०२५ व ऑगस्ट २०२५ या महिन्यांसाठी वाटपासाठी ऑपशन उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

पालघर जिल्ह्याचे धान्य पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात आले आहेत (आकडे क्विटलमध्ये)

जून २०२५

अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या ९८ हजार ३१७, प्राधान्य कुटूंब लाभार्थी संख्या १४ लाख ५५ हजार ८८९ एकूण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे मंजूर नियतन तांदूळ-६३ हजार ८६६.१३, गहू-३७ हजार ७६.५४ एकूण-१ लाख ९४२.६७

जुलै २०२५

अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या ९८ हजार ३१७ प्राधान्य कुटूंब लाभार्थी संख्या १४ लाख ५५ हजार ८८९ एकूण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे मंजूर नियतन तांदूळ-६० हजार ८५७.२६ गहू-३६ हजार ५२३.३३ एकूण-९७ हजार ३८०.५९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑगस्ट २०२५

अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या ९८ हजार ३१७ प्राधान्य कुटूंब लाभार्थी संख्या १४ लाख ५५ हजार ८८९ एकूण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे मंजूर नियतन तांदूळ-६० हजार ८५७.२६ गहू-३६ हजार ५२३.३३ एकूण-९७ हजार ३८०.५९ आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर यांनी कळविले आहे.