लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली. आचारसंहितेपूर्वी सुमारे एक हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच काही उमेदवारांची कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी जिल्हास्तरावर सुरू आहे.

One lakh women went missing in the state between 2019 and 2021
राज्यात २०१९ ते २०२१ या काळात एक लाख महिला बेपत्ता, त्यांचा शोध घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका
Supreme Court to hear petitions related to election bonds today
देणग्या ताब्यात घेण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांसंबंधीच्या याचिकांवर आज सुनावणी
Big Win For Bangladesh Protesters Bangladesh top court scales back job quotas that sparked violent protests
आंदोलक विद्यार्थ्यांना यश! बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाकडून बहुतांश नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द
RTE Act Amendment Unconstitutional,
आरटीई कायद्यातील दुरुस्ती घटनाबाह्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
‘आरटीई’तील दुरुस्तीबाबत निर्णय पुढील आठवड्यात; सरकारच्या दाव्यावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह | Decision on amendment in RTE next week Court questions government claim Mumbai
‘आरटीई’तील दुरुस्तीबाबत निर्णय पुढील आठवड्यात; सरकारच्या दाव्यावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
job opportunities in punjab national bank
नोकरीची संधी : पंजाब नॅशनल बँकेतील संधी
Due to the stress while doing the work the revenue employees of Buldhana district and the state were annoyed Buldhana
‘लाडकी बहीण’चा भार, मागण्यांकडे दुर्लक्ष करते सरकार; महसूल कर्मचारी वैतागले
Help to depositors up to one lakh in case of bankruptcy of the credit institution
पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांना एक लाखापर्यंत मदत

अधिसूचित केलेल्या क्षेत्रांतील गावांतील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) या आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील तलाठी भरतीबाबतचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी भरतीच्या माध्यमातून ४४६६ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी ५७४ उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.

आणखी वाचा-शरद पवार यांच्याकडून वळसे पाटील यांची विचारपूस

राज्यात आदिवासींची संख्या मोठय़ा प्रमाणात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे ५७४ उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.