लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : भांडण करताना हटकल्याने तिघांनी पोलिसांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना निगडीत घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रवीण कांबळे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद प्रकाश साखरे ( वय २६ रा. रावेत), वैभव भाऊसाहेब तुपे ( वय २८, रा. निगडी), अजय बाबासाहेब पोळ ( वय २१, रा. निगडी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार कांबळे सहकाऱ्यांसोबत निगडी परिसरात गस्त घालत होते. आरोपी आपसात भांडण करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, आरोपींनी पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यांनी कांबळे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, ‘पोलिसांना खूप माज आला आहे’ असे म्हणत एका पोलिसाचे बोट पिरगळले.

आणखी वाचा-पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि शत्रुघ्न माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले असता, त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रमोद आणि वैभव यांनी भिंतीवर डोके आपटून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. शिवाय, ‘तुमच्या सगळ्यांना बघून घेतो, तुमच्या सगळ्यांना कामाला लावतो’ अशी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करित आहेत.