पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात १४७.७७ लाख हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. बियाणे बदल दरानुसार सुमारे १९.२८ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे. खरिपात सर्वाधिक ५०.७० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ पेरणी क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात सरासरी १५१ लाख हेक्टर, तर रब्बीत ५१ लाख हेक्टरवर पेरणी होते. यंदाच्या खरीप हंगामात १४७.७७ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी बियाणे बदल दरानुसार १९.२८ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे. त्यापैकी महाबीजकडून ३.७६ लाख क्विंटल, राष्ट्रीय बीज निगमकडून ०.५९ लाख क्विंटल, खासगी बियाणे कंपन्यांकडून २०.६५ लाख क्विंटल, असे एकूण २५.०६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत.

खरिपात सोयाबीन प्रमुख पीक असून, यंदा ५०.७० लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी १३.३१ लाख क्विंटल बियाणांची गरज असून, १८.४६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सोयाबीन खालोखाल कापूस ४० लाख हेक्टर, भात १५.९१ लाख हेक्टर, मका ९.८० लाख हेक्टर, तूर, मूग, उडीद आदी कडधान्यांची १९ लाख हेक्टरवर आणि अन्य पिकांची १२.३६ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. सध्या कापूस बियाणांची विक्री सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात वाढीव दराने कापूस विक्री सुरू असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

Rupali Patil Thombare Ravindra Dhangekar
“फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…”, पुणे अपघातानंतरच्या कारवाईवरून धंगेकरांची टीका; रुपाली ठोंबरे प्रत्युत्तर देत म्हणाल्या…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra heatwave alert
सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
abhijt panse mns candidate
भारतीय जनता पक्षाच्या जागेवर मनसेने केला उमेदवार जाहीर, आता भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

हेही वाचा : सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

‘गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावी. बनावट (बोगस) आणि भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी विक्रेत्यांकडून खरेदी पावती घ्यावी. पावतीवरील पीक, वाण, लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, बियाणांची पिशवी मोहरबंद असावी, किंमत, खरेदीदाराचे नाव, पत्ता, विक्रेत्याच्या नावाचा पावतीवर उल्लेख असावा. रोख किंवा उधारीच्या पावतीवर वरील सर्व उल्लेख असणे गरजेचे आहे. बियाणे खरेदी-विक्रीत कोणताही गैरव्यवहार दिसून आल्यास, भेसळीची शंका असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा,’ असे आवाहन निविष्ठा आणि गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी केले आहे.