पुणे : राजकीय नेत्यांनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असणे आश्यक आहे. कारण, राजकारण हे समजून उमजून काम करण्याचे क्षेत्र आहे. राजकीय नेत्यांनी पक्षांतर करणे योग्य नाही. अलीकडे कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. सातत्याने पक्ष बदलणे ही लाजिरवाणी बाब आहे. पक्षबदलांमुळे जनतेचा रस संपतो, अशी भूमिका माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी बुधवारी मांडली.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनावेळी नायडू बोलत होते. लेखक प्रा. रामचरण, कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी, यू. टी. खादेर फरीद, उत्तर प्रदेशचे सतीश महाना, मध्य प्रदेशचे गिरीश गौतम, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस या वेळी उपस्थित होते.

मुंडे घराण्यातील राष्ट्रीय स्तरावरील चौथा शिलेदार
मुंडे घराण्यातील राष्ट्रीय स्तरावरील चौथा शिलेदार
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Ajit Pawar, Ajit Pawar latest new,
अजित पवारच का लक्ष्य ?
RSS linked weekly Vivek blames BJP poor Maharashtra Lok Sabha show on NCP tie up
“राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली”; संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकाने भाजपाला विचारले बोचरे प्रश्न
sanjay raut chandrakant patil
Sanjay Raut : “आपण एकत्र यायलाच पाहिजे”, असं म्हणत राऊतांचं चंद्रकांत पाटलांना आलिंगन; भाजपा नेते म्हणाले…
Former BJP MLA Sudhakar Bhalerao, Sudhakar Bhalerao confirm Joins NCP Sharad Pawar Group, Assembly Elections, udgir vidhan sabha seat, sattakaran article, marathi article, bjp, maharashtra politics,
भाजपचे सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश निश्चित
sharad pawar
सत्तेतील लोकांची भूमिका शपथेशी विसंगत यामुळे परिवर्तन अटळ- शरद पवार
ajit pawar lead ncp workers likley to join sharad pawar group
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारीही शरद पवार गटाच्या वाटेवर? रोहित पवारांची भेट घेतली, अजित पवारांना धक्का

नायडू म्हणाले, की राजकीय कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसमोर, विद्यार्थ्यांसमोर पक्षबदलाचे, गोंधळाचे, घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता, एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणे समोर ठेवावीत. राजकीय विचारधारा भिन्न असतील, दृष्टिकोन वेगळे असले, तरी संसदेच्या सभागृहात सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवला पहिजे. देश हा एक पक्ष मानला पाहिजे. सत्ताधारी गटाच्या अयोग्य धोरणांना, कृतींना विरोधकांनी अवश्य विरोध करावा, लोकशाहीने ती ताकद प्रत्येकाला दिली आहे. विरोधकांनी गप्प बसू नये आणि टोकाचा विरोध, हिंसाचारही करू नये. लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे, पण शत्रुत्व नसावे.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

विरोधकांनीही लोकशाहीच्या चौकटीत राहून विरोध केला पाहिजे. गदारोळ, घोषणाबाजी करून संसदेच्या कामकाजात सतत अडथळे आणणे, काम बंद पाडणे योग्य नाही. संसदेचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवत संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावे. वाचन करून, अभ्यास करून भाषण करावे, असेही त्यांनी सांगितले.