टेलीकॉम कंपन्यांकडुन २०२३ मध्ये मोबाईल बिलची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल युजर्सच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. यामागे अनेक कारणं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणत्या कारणांमुळे मोबाईल बिलची किंमत वाढणार आहे जाणून घ्या.

२०२३ च्या मध्यापर्यंत टेलिकॉम कंपन्यांकडुन मोबाईल बिलची किंमत वाढवण्यात येणार आहे. 5g संबंधित ARPU (Average Revenue Per User) टैरिफ नागण्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 4ग टैरिफची किंमत वाढवण्यात येणार असल्याची माहिती टेलिकॉम कंपन्यांनी दिली.

या दरवाढीमध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड या दोन्ही प्लॅन्सची किंमत वाढणार आहे. यामुळे पोस्टपेड युजर्सना देखील नेहमीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे. याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये अशी टैरिफ हाईक करण्यात आली होती. यामध्ये वोडाफोन आयडियाने सर्वात आधी दरवाढ करून, किंमती ४२ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. त्यानंतर एअरटेल आणि जिओनेही किंमती वाढवल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

5जी प्लॅन्स देखील महागणार?
एअरटेल आणि जिओ दोन्ही टेलिकॉम कंपन्यांकडुन हे स्पष्ट करण्यात आले आहे की 5जी प्लॅन्स महागणार नाहीत. या कंपन्यांनी 5जी सेवा प्रीमियम करण्यात येणार नाही. त्यामुळे युजर आता सुरू असणाऱ्या रिचार्ज प्लॅन्सवर 5जी सेवेचा लाभ घेऊ शकतील. परंतु मोबाईलमध्ये 5जी सेवा सुरू करण्यासाठी एक रक्कम भरणे आवश्यक असेल, जे आताही आवश्यक आहे.