ठाणे : महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

हेही वाचा… “राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम, पण अनेक वेळा…”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

हेही वाचा… ठाणे जिल्हा बनतोय बिबट्याचे अधिवास क्षेत्र? नैसर्गिक परिस्थितीची अनुकुलता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन शुक्रवारी ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी बाबा रामदेव हे महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.