Marathwada floods 2025 / ठाणे : मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय पक्षांसह अनेक नागरिक पुढे आले असतानाच, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand दिघे) यांचे पुतणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) हे सुद्धा मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांच्याकडून मोफत औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी औषधांचा साठा शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्या उपस्थितीत पुणे येथून टेम्पो भरून रवाना करण्यात आला आहे.

मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय पक्षांसह अनेक नागरिक पुढे आले असून त्यापाठोपाठ आता पूरग्रस्तांना या संकटकाळात मदत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुढे सरसावला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील स्थानिक शिवसैनिकांसह मदतकार्यात सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पुढाकार घेतला आहे.

मोफत औषध पुरवठा

केदार दिघे हे आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करणार आहेत. यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाला आहे. यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा प्रमुख उल्हास शेवाळे, राज्य संघटक वसंत मोरे, शहर प्रमुख संजय मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर मोडक, सुजित थेवरे, नितीन गावडे, प्रतिष्ठानचे अभिषेक जाधव, रोहन आंब्रे, संजय पाठक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा टेम्पो रवाना झाला.

पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न

याविषयी बोलताना केदार दिघे म्हणाले, “पुराच्या पाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांपर्यंत आरोग्यविषयक मदत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार आणि शिकवणीनुसार आम्ही हे मदतकार्य करत आहोत. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे स्थानिक पातळीवर नागरिकांना धीर देत असून, मदतकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे.”