Shocking Video: उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एका व्यक्तीला त्याच्या सासरच्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की, त्या व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या भावांकडून बेदम मारहाण केली जात आहे कारण त्याने पत्नीला त्यांच्या घरी आलेल्या एका अज्ञात पुरूषाबद्दल विचारले होते.

FPJच्या वृत्तानुसार त्याच्या सासरच्यांनी त्याला सार्वजनिकरित्या मारहाण केली आणि रक्तबंबाळ करून सोडले तर त्याची पत्नी हस्तक्षेप न करता तिथेच उभी होती. ही घटना सिंघवली अहीर पोलिस स्टेशन हद्दीतील डोला गावात घडल्याचे वृत्त आहे.

पीडिताची ओळख पटली असून तो रामपालचा मुलगा रोहित आहे, जो वीज विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. रोहितने आरोप केला आहे की शनिवारी (१४ जून) रात्री त्याच्या पत्नीच्या भावांनी त्याच्यावर क्रूर हल्ला केला, कारण रोहितने त्याच्या पत्नीला त्यांच्या घरी आलेल्या एका अज्ञात व्यक्तीबद्दल विचारले होते.

हिंसाचार इतका वाढला की रोहितचे काका आणि मेहुणी, ज्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, ते देखील या घटनेत जखमी झाले. गंभीर जखमी असूनही, रोहित तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन गाठण्यात यशस्वी झाला.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @news24tvchannel या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “२५ सेकंदात ३५ हून अधिक बुक्के मारून सासरच्यांनी जावयाला मारहाण केली”

पोलीस स्टेटमेंट

पोलिसांनी जखमींची वैद्यकीय तपासणी केली आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींना अटक केली जाईल.

पोलिसांनी सांगितलं की, “या संदर्भात सिंघवली अहिर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.”

व्हायरल व्हिडिओमध्ये रोहितला मारहाण होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते आणि त्याची पत्नी काहीच न करता फक्त पाहत असल्याचं दिसतंय. या घटनेमुळे तिच्या भूमिकेबद्दल आणि पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराच्या व्यापक मुद्द्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विषयाला अनेकदा सार्वजनिक लक्ष किंवा कायदेशीर पाठिंबा फारसा मिळत नाही.

स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या प्रतिसादाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. दृश्य पुरावे असूनही अटक न होणे हे आरोपींना लपवून ठेवल्याचे सूचित करते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

“जर एखाद्या महिलेला फक्त प्रश्न विचारल्याबद्दल मारहाण होऊ शकते आणि तरीही पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत, तर आपल्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल याचा काय संदेश जातो?” असा प्रश्न एका स्थानिक रहिवाशाने विचारला.




This quiz is AI-generated and for edutainment purposes only.