सामुद्रिक शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या पायाची बोटे पाहून त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव कळू शकतो. सामुद्रिक शास्त्राची रचना समुद्र ऋषींनी केली होती, म्हणून त्याचे नाव सामुद्रिक शास्त्र पडले. या शास्त्रात शरीराच्या सर्व अवयवांप्रमाणेच पायाच्या बोटांबाबतही माहिती सांगण्यात आलीये. चला जाणून घेऊया की पायाच्या बोटांवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे ओळखता येते…
ज्यांची बोटे पातळ आहेत–
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीची बोटे पातळ असतात, ती व्यक्ती कंजूष आणि कठोर मनाची असते. अशा व्यक्तीला नेहमीच स्वतंत्र जगायला आवडते.
ज्यांची बोटे जाड आहेत:
ज्या लोकांची बोटे जाड असतात, ते तोंडावर बोलणारे आणि स्पष्टवक्ते असतात. ते मनाने चांगले असतात. या लोकांचा स्वभाव आनंदी असतो. त्यांना फार राग येत नाही. हे लोक प्रयत्न करतात की त्यांच्यामुळे इतर कोणालाही त्रास होऊ नये.
बोटांमध्ये जास्त अंतर –
ज्या लोकांच्या पायाच्या बोटांमध्ये खूप अंतर असते, ते स्वभावाने घमंडी आणि स्वार्थी असतात. तसेच, हे लोक स्वतःचे स्थान स्वतःच साध्य करतात. हे लोक मनी माइंडेड असतात. या लोकांचे छंद महाग असल्याने त्यांना पैसे जोडता येत नाहीत. त्याचबरोबर या लोकांना समाजात खूप मानसन्मान मिळतो.
बोटांमध्ये अंतर नसणं –
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या पायाच्या बोटांमध्ये अंतर नसते, ते खूप प्रामाणिक आणि निष्ठावान असतात. तसेच हे लोक गर्दीपासून दूर राहतात. कारण त्यांना शांतता आवडते. ते एवढेच लोक जपतात ज्यांच्याबरोबर ते खुश असतात. तसेच हे लोक आपल्या लाइफ पार्टनरला खूप खुश ठेवतात.