देशात मागील काही दिवसांपासून करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्ये ४४ हजार ७३९ जणांनी करोनावर मात केली असून, ३८ हजार ६१७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ४७४ रुग्णांचा या कालावधीत मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८९ लाख १२ हजार ९०८ वर पोहचली आहे.
सद्यस्थितीस देशात ४ लाख ४६ हजार ८०५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ८३ लाख ३५ हजार ११० जण करोमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. याशिवाय देशभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ३० हजार ९९३ झाली आहे.
With 38,617 new #COVID19 infections, India’s total cases rise to 89,12,908. With 474 new deaths, toll mounts to 1,30,993
Total active cases at 4,46,805 after a decrease of 6,596 in the last 24 hrsTotal discharged cases at 83,35,110 with 44,739 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/YJqMCnFbCJ
— ANI (@ANI) November 18, 2020
देशात १२,७४,८०,१८६ नमुन्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली आहे. यापैकी कालण(१७ नोव्हेंबर) रोजी ९ लाख ३७ हजार २७९ नमुने तपासण्यात आले. आसीएमआर कडून ही माहिती प्राप्त झाली आहे.
A total of 12,74,80,186 samples tested for #COVID19, up to 17th November. Of these, 9,37,279 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/lsmN95r5Bw
— ANI (@ANI) November 18, 2020
करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या रोज अधिक आढळत आहे. नक्कीच ही दिलासादायक बाब असली, तरी देखील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सणासुदीचा काळ असल्याने करोना संसर्गाचा धोका जास्त असल्याचेही सांगितले जात आहे.