विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान मोदी आणि राजकारण्यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Kashmiri Pandit Exodus: …तर मला फाशी द्या – फारुख अब्दुल्ला

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
lok sabha election 2024 uddhav thackeray slams bjp over electoral bond issue
भाजप हाच ठगांचा पक्ष; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie
“१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करून, भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार लोकांच्या मनात आमच्याविरोधात द्वेष निर्माण करू इच्छित आहे, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. “त्यांना लोकांच्या मनात आमच्या विरोधात आणखी द्वेष निर्माण करायचा आहे. ते म्हणत आहेत की प्रत्येक पोलीस आणि सैनिकाने हा चित्रपट पाहावा जेणेकरून ते आमचा तिरस्कार करतील. जसा जर्मनीमध्ये हिटलर आणि गोबल्स यांनी लोकांच्या मनात द्वेष तयार केला होता. तेव्हा तिथे सहा लाख ज्यूंना किंमत त्याची मोजावी लागली होती. भारतात किती लोकांना या द्वेषाची किंमत मोजावी लागेल, मला माहित नाही,” असं फारुख अब्दुल्ला इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

“काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा भाजपा समर्थित…;” The Kashmir Files वरून संतापलेल्या ओमर अब्दुल्लांचा आरोप

“हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे. या चित्रपटाने राज्यातील प्रत्येक जीवाला, हिंदू आणि मुस्लिमांना प्रभावित केले आहे. ती घटना आठवून माझं मन सुन्न होतं,” असं ते म्हणाले.