पाटणा : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयावर फार चर्चा करण्याची गरज नाही, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी व्यक्त केले. इंडिया आघाडीने आपली भविष्यातील रणनीती निश्चित करण्यासाठी वेगाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीवर आपण लक्ष केंद्रित करत असल्याचे नितीशकुमार म्हणाले. ही बैठक आता या महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात होणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, ही बैठक बुधवारी नवी दिल्लीत होणार होती. मात्र, अनेक घटक पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे ती दोन आठवडयांनी पुढे ढकलण्यात आली. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीविषयी रणनीती ठरवण्यासाठी नवी दिल्लीत १७ डिसेंबरला आघाडीची बैठक होणार आहे, असे मंगळवारी सांगितले होते.

BJP leaders request to RSS
‘अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळा’, भाजपानं संघाला विनंती केल्याची चर्चा; राजकीय तर्कवितर्कांना उधाण!
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Ajit Pawar on Nilesh Lanke
अजित पवार यांनी सांगितलंं सिक्रेट, “निलेश लंकेंनी ‘त्या’ अटीवर माझ्याकडून लोकसभा लढण्याची..”
bjp eyes on Maharashtra Assembly Speaker post
विधान परिषद सभापतीपदाचा महायुतीत तिढा; तिन्ही पक्षांचा पदावर दावा
sanjay shirsat on bachchu kadu third fornt
विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीचे बच्चू कडूंचे संकेत? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी तुमची…”
sharad pawar group to accept donations from public
शरद पवार गटाला देणग्या स्वीकारण्याची मुभा; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा
Vice President question on P Chidambaram criticism about Parliament print politics news
आम्ही संसदेत ‘पार्ट टाइमर’ आहोत काय? चिदम्बरम यांच्या टीकेवर उपराष्ट्रपतींचा सवाल
Sanjay Raut on Pm Narendra Modi Speech
‘बालबुद्धीच्या नेत्यानेच मोदींना घाम फोडला’, संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

हेही वाचा >>> भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

पाटण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले की, ‘‘काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. निवडणुकीच्या राजकारणात या गोष्टी होत राहतात. आधी या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते. आता भाजप जिंकली आहे. यावर फार चर्चा करण्याची गरज नाही.’’

तृणमूलची जलद जागावाटपाची मागणी

कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जलद जागावाटप करावे, अशी सूचना तृणमूल काँग्रेसने केल्याचे समजते. जागावाटपाबरोबरच भाजपसमोर विश्वसनीय आव्हान उभे करण्यासाठी एकत्रित भूमिका स्थापित करण्यासाठी आणि अंतिम जाहीरनामा निश्चित करण्यासाठीही तृणमूल काँग्रेस आग्रही आहे. तीन यशस्वी बैठकांनंतर निर्माण झालेला उत्साह, काँग्रेस विधानसभा निवडणुकांमध्ये व्यग्र झाल्यानंतर आलेल्या निष्क्रियतेमुळे मावळला असल्याचे मतही या पक्षाकडून व्यक्त केले गेले.