Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी या व्यावसायिकाची हत्या त्याची पत्नी सोनमनेच गेल्या महिन्यात २३ मे रोजी घडवून आणली. सोनम आणि राजा या दोघांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. २० मे रोजी हे दोघं मधुचंद्राला गेले होते. त्यावेळी शिलाँगच्या इस्ट खासी हिल्स या ठिकाणी ट्रेक केल्यानंतर सोनमने राजाला सुपारी किलर्सकडून ठार केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह दरीत फेकला. सुरुवातीला सोनम आणि राजा हे दोघंही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र २ जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह दरीत आढळून आला. सोनमने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून म्हणजेच राज कुशवाहासह मिळून ही हत्या घडवून आणली. या दोघांनी आता प्रेमसंबंधांची कबुली दिली आहे असं मेघालाय पोलिसांनी म्हटलं आहे.
मेघालय पोलिसांनी काय सांगितलं?
मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुशवाहा आणि सोनम रघवुंशी यांनी एकमेकांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं मान्य केलं आहे. तसंच राजा रघुवंशीच्या हत्येचा कट त्यांनी रचल्याचंही म्हटलं आहे. पोलीस अधीक्षक विवेक सैय्याम यांनी ही माहिती दिली आहे. तसंच हत्येचा कट रचल्याचीही कबुली दिली आहे. सोनम आणि राज यांचे प्रेमसंबंध सोनमच्या कुटुंबाला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सोनमचं लग्न राजा रघुवंशीशी ठरवलं. सोनमला हे लग्न मान्य नव्हतं. राजाशी माझं लग्न करुन द्याल तर मी काय करेन तुम्ही बघाच असं सोनमने बजावलं होतं. अशी माहिती विवेक सैय्याम यांनी माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
सोनम आणि राजचं अफेअर हेच ठरलं राजाच्या हत्येचं कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम आणि राज यांचं अफेअर होतं. त्यामुळेच राजाची हत्या झाली. राजाची हत्या होण्यामागे या दोघांचे प्रेमसंबंध हेच प्रमुख कारण ठरलं. राज कुशवाहा आणि सोनम यांनी प्रेमसंबंधाची कबुली आता दिली आहे. तसंच राजाच्या हत्येमागे आर्थिक कारणही आहे असा संशय आम्हाला आहे. आम्ही त्या पैलूचाही तपास करत आहोत असं पोलिसांनी म्हटलंय.
सोनमने तीन सुपारी किलर्सच्या मदतीने घडवून आणली राजाची हत्या
सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची तीन सुपारी किलर्सच्या मदतीने हत्या घडवून आणली. या प्रकरणात फरार असलेली सोनम रघुवंशी ८ जूनच्या रात्री उशिरा पोलिसांना शरण आली. त्यानंतर आता या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. शिलाँग पोलिसांनी रविवारी (२२ जून) या प्रकरणात सिलोम जेम्स या आणखी एका आरोपीला अटक केली. सिलोम जेम्सला घेऊन पोलीस कृष्णा विहार या सोसायटीत गेले होते. राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम जेव्हा इंदूरमध्ये परत आली तेव्हा ती याच सोसायटीतल्या एका फ्लॅटमध्ये राहिली होती. तिची ब्लॅक बॅग याच सोसायटीतून गायब करण्यात आली. तसंच या प्रकरणात आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.