First ‘Made-in-India’ locomotive for export: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारमध्ये तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक डिझेल लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवला. हे मेड इन इंडिया लोकोमोटिव्ह थेट आफ्रिकेत पाठवले जाणार आहे. हे भारताच्या जागतिक आणि निर्यात उद्दिष्टांच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यात असलेल्या मारहोरा डिझेल लोकोमोटिव्ह प्लांटमध्ये हे तयार करण्यात आले आहे. देशाच्या मेक इन इंडिया’ ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या उपक्रमांतर्गत ही एक महत्त्वाची कामगिरी म्हणून ओळखली जात आहे.
बिहार निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा चौथा बिहार दौरा आहे. त्यांनी सिवानमधील त्यांच्या मुक्कामादरम्यान ९ हजार १४५ कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. “मी गुरूुवारीच परदेशातून परतलो. या भेटीदरम्यान मी जगातील समृद्ध देशांच्या नेत्यांशी बोललो. सर्व नेते भारताच्या जलद गतीने होणाऱ्या विकासाने खूप प्रभावित झाले आहेत. ते भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता ठरताना पाहतात. बिहार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे”, असे मोदी यावेळी म्हणाले.
लोकोमोटिव्ह म्हणजे नेमके काय?
लोकोमोटिव्ह म्हणजे रेल्वे गाडी किंवा इंजिन ओढण्यासाठी वापरले जाणारे एक शक्तिशाली इंजिन आहे.
भारतातील पहिल्या निर्यात होणाऱ्या लोकोमोटिव्हची वैशिष्ट्ये
पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, बिहारच्या सारण जिल्ह्यातील मारहोरा डिझेल लोकोमोटिव्ह प्लांटमध्ये बांधलेले हे पहिले निर्यात होणारे युनिट आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले, “पूर्वी या प्लांटमध्ये केवळ भारतीय रेल्वेसाठी लोकोमोटिव्ह तयार केले जात होते. मात्र आता मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढल्याने आंतरराष्ट्रीय निर्यातीचे दरवाजे उघडले आहेत. आम्हाला आफ्रिकेकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यासाठी स्टँडर्ड-गेज लोकोमोटिव्हची आवश्यकता आहे. पुढील तीन वर्षांत आफ्रिकेला त्यांच्या लोहखनिज खाणीसाठी १५० लोकोमोटिव्ह पाठवली जातील.”
बिहारमधील ही फॅक्ट्री वॅबटेक इंक आणि भारतीय रेल्वेचा संयुक्त उपक्रम आहे. त्यामध्ये वॅबटेकचा ७६ टक्के वाटा आहे आणि रेल्वेचा २४ टक्के वाटा आहे. २०१८ मध्ये स्थापन झालेल्या या कारखान्याने आतापर्यंत ७२९ शक्तिशाली डिझेल इंजिने तयार केली आहेत. त्यामध्ये ४,५०० उच्च शक्तीच्या ५४५ आणि ६०० उच्च शक्तीच्या १८४ इंजिनांचा समावेश आहे. हा प्लांट जागतिक लोकोमोटिव्ह उत्पादन केंद्र बनल्यानंतर त्याची क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. २६ मे २०२५ रोजी दक्षिण आफ्रिकेतील गिनी देशाच्या तीन मंत्र्यांनी या प्लांटला भेट दिली होती. त्यानंतर १४० लोकोमोटिव्ह इंजिनांसाठीचा करार अंतिम झाला होता. त्याला कोमो, असे नाव देण्यात आले. हा करार सुमारे ३००० कोटी रुपयांचा आहे. मधौरा यांच्यासाठी हा केवळ एक व्यावसायिक करार नाही, तर जागतिक पुरवठा साखळीत भारताच्या नवीन भूमिकेचा पुरवा आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- लोकोमोटिव्हचे तीन प्रमुख प्रकार असतात
- स्टीम लोकोमोटिव्ह, डिझेल लोकोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह
- ते रेल्वेला जोडलेल्या इंजिनला किंवा रेल्वे गाडीला ओढते
- रेल्वे गाडीला किंवा मालगाडीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते
- १८७७ मध्ये अजमेरमध्ये बनवलेले F-1/734 स्टीम लोकोमोटिव्ह हे भारतातील पहिले स्वदेशी लोकोमोटिव्ह आहे.
वॅबटेक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप यांनी नमूद केले की, लोकोमोटिव्ह हे गिनीच्या सिमंडौ प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा जगातील सर्वांत मोठ्या लोहखनिज खाण प्रकल्पांपैकी एक मानला जातो. बा प्रकल्प २०१५ मध्ये परत देण्यात आला होता. त्यामध्ये वॅबटेककडे ७५ टक्के इक्विटी भागीदारी होती आणि भारतीय रेल्वेकडे २५ टक्के भागीदारी होती. उत्पादन सुरू झाल्यापासून प्लांटने भारतीय रेल्वेला ७२६ लोकोमोटिव्ह वितरित केलेी गेलीआहेत आणि आता जवळपास ३,००० कोटी रुपये किमतीची १५० युनिट आफ्रिकेला पाठवली जातील.
या संदर्भातील एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, लोकोमोटिव्ह उच्च-शक्ती इंजिन, प्रगत एसी प्रोपल्शन सिस्टीम, मायक्रोप्रोसेसर आधारित नियंत्रण प्रणाली, एर्गोनॉमिक कॅब डिझाइन व ब्रेकिंग यांसारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, “हा क्षण एक ऐतिहासिक टप्पा आहे. पहिल्यांदाच बिहारमधील एक उत्पादन युनिट जागतिक बाजारपेठेत निर्यात केले जाणार आहे. त्यामुळे भारत जागतिक रेल्वे उत्पादन केंद्र नकाशावर ठामपणे उभा असेल”, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच हे यश भारताची आत्मनिर्भरता आणि जागतिक स्पर्धात्मकता यांकडे वाटचाल दर्शविते, असेही म्हटले आहे.
मोदींचा बिहार दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सिवान इथून बिहारच्या त्यांच्या नवीनतम दौऱ्याची सुरुवात केली. तिथे त्यांनी वैशाली देवरिया रेल्वे लाईन प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा एक मोठा विकास म्हणून पाहिला जातो. त्यांनी मुझफ्फरपूर व बेतियामार्गे पाटलीपुत्र आणि गोरखपूरला जोडणारी एक नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सेवादेखील सुरू केली. पंतप्रधानांनी निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राज्यातील विविध प्रदेशांमध्ये त्यांच्या संपर्काचा भाग म्हणून भागलपूर, मधुबनी व विक्रमगंज येथे प्रवास केला होता. येत्या काही महिन्यांत बिहार दौरा पुन्हा होऊ शकतो, असे एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्सप्रेसकडे स्पष्ट केले आहे