ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी बीसीसीआयने १६ सदस्यांच्या भारतीय संघाची आज घोषणा केली आहे. श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिका खेळलेल्या संघात फारसे बदल न करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलेला दिसतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंची निवड करण्यात आलेली नाहीये. रविचंद्रन आश्विन सध्या काऊंटी क्रिकेट खेळतोय.

या मालिकेसाठीही विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. १७ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवड झालेल्या शार्दुल ठाकूरला मात्र या संघात जागा मिळालेली नाहीये. त्याजागी उमेश यादव आणि मोहम्मद शमीला पुन्हा संघात स्थान देण्यात आलं आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना पाहण्यासाठी पूर्वीपेक्षा ४५० रुपये जादा मोजावे लागणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा वन-डे संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी