Kapil Dev on Team India: भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाच्या पराभवातून भारतीय चाहते अजूनही सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत आपण क्रिकेटला इतर खेळांप्रमाणेच वागवले पाहिजे आणि जास्त वातावरण निर्मिती करू नये, असे मत माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. यामुळे सर्व भारतीयांचे मन तुटते, असेही पुढे कपिलने म्हटले आहे. १९ नोव्हेंबर रोजी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता पण विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

भारतासाठी १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकणारा माजी कर्णधार कपिल देव म्हणाला की, “अतिप्रचार आणि वातावरण निर्मितीमुळे चाहत्यांचे मन तुटते, त्यामुळे माध्यमांनी संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.” तो पुढे म्हणाले की, “भारतीय चाहत्यांनी संघावर इतका दबाव आणू नये आणि क्रिकेटला इतर खेळांप्रमाणे वागवावे.” कपिल देव मंगळवारी म्हणाले, “इतक्या अपेक्षा ठेवू नका की तुमचे मन तुटते. समतोल निर्माण करणे महत्त्वाचे आहे. विश्वचषक खेळण्यासाठी इतर संघही भारतात आले होते. एवढा अतिप्रचार आणि टीम इंडियाच्या बाजूने वातावरण निर्मिती करू नका, खेळाला खेळ मानायला हवे. सामन्याच्या दिवशी जो चांगला खेळतो त्याचा आदर आपण करायला हवा. आम्ही भारतीय खूप भावनिक आहोत.”

Bhaiyyaji Joshi of RSS said India should become super nation not superpower
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Former India captain Sunil Gavaskar opinion on the selection of Rohit Sharma Virat Kohli sport news
रोहित, विराटचे भवितव्य निवड समितीच्या हाती; भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचे मत
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
Sunil Gavaskar Big Statement on Team India Test Series Defeat Against Australia Rohit Sharma IND vs AUS bdg 99
IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?

हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडियाच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचे मोठे विधान; म्हणाला, “हा वेडेपणा होता…”

कपिल पुढे म्हणाले की, “आजचे खेळाडूच सांगू शकतील की त्यांना किती दडपण आहे. आम्ही फक्त अनुभव घेऊ शकतो. भारत जेव्हा जिंकतो तेव्हा सर्वांना छान वाटतं मात्र, त्यावेळी संघातील काही कमतरतांकडे लक्ष देणे गरजेचे होते. विजयानंतरही उणीवा कायम असून त्या दूर करणे महत्त्वाचे आहे.” माजी कर्णधार म्हणाले, “भारताने सलग दहा सामने जिंकले. हे पुरेसे नाही का? आपण इतर संघांकडेही लक्ष दिले पाहिजे. तुलना करायची गरज नाही. आम्ही चांगले खेळलो की नाही हे पाहिले पाहिजे. आम्ही खूप चांगले खेळलो आणि फक्त फायनलचा दिवस आमचा नव्हता.”

हेही वाचा: Team India: रोहित-विराट टी-२० मध्ये पुनरागमन करणार? पुढील आठवड्यात आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची होणार घोषणा

कपिल देव म्हणाले, “दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडे बघा. इंग्लंड गतविजेता होता पण सातव्या स्थानावर राहिला.” अंतिम सामन्यातील पराभवानंतर खेळाडूंचे सांत्वन करण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुमला भेट दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले, “पंतप्रधान प्रोत्साहन देणार नाहीत, तर कोण देणार? ते देशातील नंबर वन व्यक्ती असून त्यांचा पाठिंबा मिळाल्याने बरे वाटते.” गेल्या १० वर्षात भारताला ८ पैकी ७ आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

रोहित- विराट टी-२० विश्वचषक खेळणार का?

भारतीय संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी होती पण रोहित शर्मा अँड कंपनीने ती संधी गमावली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित प्रथमच कर्णधार होता. त्यांना ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती. भारतीय संघ आता पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये खेळतील का? याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने संपूर्ण संघ बदलला आहे.

Story img Loader