India vs Australia 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या कसोटी सामन्यात भारत प्रथम गोलंदाजी करत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने भारतासाठी एक मोठा विक्रम केला आहे. अश्विनने या मालिकेत पहिली विकेट घेताच एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.  

ऑस्ट्रेलियातील नागपूर कसोटीत टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने कांगारूंचा यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीला बॉलिंग देत कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी पूर्ण केल्या. अनिल कुंबळेला मागे टाकून तो सर्वात जलद ४५० कसोटी बळी घेणारा भारतीय ठरला आहे. अश्विनने आपल्या ८९व्या कसोटीतील १६७व्या डावात गोलंदाजी करताना ही कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ४५० किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा जगातील नववा आणि दुसरा भारतीय गोलंदाज आहे. कुंबळेने कारकिर्दीतील ९३व्या कसोटीत हा आकडा गाठला.

Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Rohit sharma becomes first Indian player to win 250 T20
Rohit Sharma Records: रोहित शर्माच्या नावे अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

अश्विनने केला ४५० बळी घेण्याचा विक्रम

श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर ८०व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करणारा भारतीय ऑफस्पिनर आता ४५०वी कसोटी बळी मिळवणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अश्विनने अ‍ॅलेक्स कॅरीला ३६ धावांवर तंबूत पाठवून कसोटी सामन्यात आपला ४५०वा बळी मिळवला.

अश्विनचा कसोटी विक्रम असा आहे

२०११ साली कसोटी पदार्पण करणाऱ्या रविचंद्रन अश्विनला या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल १२ वर्षांचा कालावधी लागला आहे. वृत्त लिहिपर्यंत अश्विनने आपल्या कारकिर्दीत ८९ कसोटी सामन्यांच्या १६७ डावांमध्ये २४.३३ च्या सरासरीने ४५१ बळी घेतले आहेत. अश्विनने एका डावात ३० वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी आणि ७ वेळा सामन्यात १० किंवा त्याहून अधिक गडी बाद करण्याची कामगिरी त्याने केली आहे. एका डावात ५९ धावांत ७ बळी आणि १४० धावांत १३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

हेही वाचा: IND vs AUS 1st Test: शानदार पुनरागमन! चेंडू कळण्याआधीच फलंदाज तंबूत; सर जडेजाच्या कामगिरीसोबत नवीन लूकही होतोय फेमस 

४५० हून अधिक बळी घेणारा नववा गोलंदाज

मुथय्या मुरलीधरन (८००), शेन वॉर्न (७०८), जेम्स अँडरसन (६७५), अनिल कुंबळे (६१९), स्टुअर्ट ब्रॉड (५६६), ग्लेन मॅकग्रा (५६३), कोर्टनी वॉल्श (५१९) यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन, नॅथन लियॉन (४६०) यांनी धावा केल्या.