TATA IPL 2023 Final, CSK vs GT : आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना रविवारी मुसळधार पावासमुळे रद्द झाला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा हा सामना आज २९ मे रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान, अमहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण २० षटकांचा होण्याची दाट शक्यता आहे. पण सामना राखीव दिवशी होत असल्याने दोन खेळाडूंना याचा खूप आनंद झाला आहे. वीरेंद्र सेहवागने याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला खूप जास्त आनंद झाला आहे. सेहवागने यामागचं कारण सांगितलं आहे.

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघ फायनल खेळण्यासाठी सज्ज झाले होते. रविवारी हा सामना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. परंतु, मैदानात मुसळधार पाऊस कोसळल्याने नाणेफेकही झाली नाही. पावसाची संततधार सतत सुरु होती, त्यामुळे मैदानात पाणी साचलं होतं. शेवटच्या टप्प्यात अंपायर्सने निर्णय घेतला की, अशा परिस्थितीत सामना ५-५ षटकांचाही होणार नाही. सामना रद्द झाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Virat Kohli Fined 50 percent Match Fees For Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: विराट कोहलीला आऊट झाल्यावर पंचांशी वाद घालणं पडलं महागात, ठोठावला मोठा दंड
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’

नक्की वाचा – सामना पाहण्याच्या उत्सुकतेवर ‘पाणी’ फेरलं! रात्र वैऱ्याची होती, पण धोनीच्या चाहत्यांसाठी नाही, स्टेशनवरचा ‘तो’ Video झाला Viral

सामना पूर्णपण रद्द झाल्याने खेळाडूंनाही राखीव दिवशी खेळण्याची संधी मिळाली. सेहवागच्या म्हणण्यानुसार, रविवारी सामना ५-५ षटकांचा झाला असता, तर या खेळाडूंचा रोल राहिला नसता. तसंच कदाचित त्यांना खेळायची संधीही मिळाली नसती. साई सुदर्शन आणि अजिंक्य रहाणे दोन्ही खेळाडू नंबर तीनवर खेळतात. जर पाच षटकांचा सामना झाला असता तर या दोन्ही खेळाडूंना फलंदाजी मिळाली नसती. कारण दोन्ही संघांनी त्यांच्या आक्रमक फलंदाजांना मैदानात उतरवले असते.