विश्वचषक २०२३ स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या टीम इंडियाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीला क्षेत्ररक्षण निवडलं आणि भारतीय संघाची अवस्था सर्वबाद २४० अशी केली. Latest Marathi news यानंतर जेव्हा भारताने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या १० ओव्हरमध्येच तीन विकेट गेल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र ट्रॅव्हिस हेडची १३७ धावांची खेळी आणि लाबुशेनची ५८ धावांची नाबाद खेळी यामुळे ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा जगज्जेता ठरला. असं असलं तरीही भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

विश्वचषकात एकही सामना हरला नाही भारतीय संघ

रोहित शर्माच्या टीमला कपिल देव आणि महेंद्र सिंग धोनी या दोघांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करता आली नाही. मात्र त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. विश्वचषकात एकही सामना आपला संघ हरला नव्हता. अंतिम सामन्याच्या आधी उपांत्य सामन्यातही भारताने जी खेळी केली ती लाजवाबच होती. टीम रोहितने प्रयत्नांची शिकस्त केली होती. मात्र त्यांना आज धावसंख्येचा डोंगर रचता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचं आव्हान अगदीच सोपं झालं. ऑस्ट्रेलिय संघाचं क्षेत्ररक्षण, गोलंदाजीचा भेदक मारा यामुळे भारतीय संघ २४० धावांवरच मर्यादीत राहिला. जेव्हा धावसंख्या मोठी असते तेव्हा त्याचा पाठलाग करणं कठीण होतं. ही बाब लक्षात आल्याने अगदी व्यवस्थित ठरवून ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला धावसंख्येचा फलक सातत्याने हलता ठेवण्यापासून रोखलं आणि चौकार षटकारांची आतषबाजीही तेवढ्याच खुबीने रोखली.

loksatta analysis gautam gambhir s appointment as head coach of team india even though he has no experience
रोखठोक, स्पष्टवक्ता गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणार? प्रशिक्षकपदाचा अनुभव नसतानाही नियुक्तीमागे काय कारणे?
olympic quiz
ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल तुम्हाला किती माहितेय?
Hardik Pandya Becomes No 1 Bowler After T20 WC Heroics
हार्दिक पंड्याने रचला इतिहास, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Why Rohit Sharma Retired from T20I
Rohit Sharma : “मला T20I क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची नव्हती पण…”, हिटमॅनचा VIDEO होतोय व्हायरल
Who is the contender for the captaincy of Team India
Team India : भारताच्या टी-२० संघाचा पुढील कर्णधार कोण? रोहित शर्मानंतर ‘या’ तीन खेळाडूंची नावं आघाडीवर
best moment of my career says rohit sharma after winning t20 world cup
माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण! ट्वेन्टी२० विश्वविजयानंतर कर्णधार रोहितची भावना
Rohit Sharma Creates History in T20 World Cup
Rohit Sharma : हिटमॅनने टी-२० विश्वचषकात रचला इतिहास, आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO

रोहितची कामगिरी सुंदर

वनडे प्रकारात तीन द्विशतकं नावावर असणाऱ्या रोहितने वर्ल्डकपसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारणार असल्याचं सहकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानुसार प्रत्येक सामन्यात रोहितने जोरदार फटकेबाजी करत प्रतिस्पर्ध्यांना निरुत्तर केलं. अंतिम मुकाबल्यातही रोहितने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता. तो चौकार-षटकारांची लयलूट करत होता. रोहित बाद झाला आणि भारताची धावगती मंदावली. कठीण खेळपट्टी आणि दर्जेदार गोलंदाजीविरुद्धही रोहितने दमदार सुरुवात करुन दिली. भारतीय संघाने सलग १० सामने जिंकले यात रोहितच्या खेळीचा आणि नेतृत्वगुणांचा सिंहाचा वाटा आहे.

२०११ मध्ये धोनीने विश्वचषक जिंकला होता. त्याआधी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने विश्वचषक जिंकला होता. आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडेल असं वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अर्थात हा खेळ आहे, त्यामुळे हार-जीत तर होणारच. भारतीय संघ उपविजेता ठरला आहे तरीही त्यांची या विश्वचषकातली कामगिरी मात्र विसरता येणार नाही.