Do fibrous fruits and vegetables always need to be peeled :आपल्यापैकी अनेकांनी हा प्रश्न कधी ना कधी विचारलेला असतो — तंतुमय (फायबरयुक्त) फळं आणि भाज्यांची सालं सोलणं गरजेचं आहे का? बहुतेक वेळा याचं उत्तर असतं – नाही, जर स्वच्छतेकडे लक्ष दिलं गेलं तर सालं काढण्याची आवश्यकता नसते.
सालांमधील पोषणमूल्यं – आरोग्यासाठी खजिना
गाजर, काकडी, सफरचंद, बीट, रताळं आणि कधीकधी कीवी यांसारख्या फळभाज्यांच्या सालांमध्ये फायबर भरपूर असतो — आणि सध्या फायबर हीच सर्वात जास्त चर्चेत असलेली ‘सुपरफूड’ घटकद्रव्यं आहे. याशिवाय, सालांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं (व्हिटॅमिन्स) आणि खनिजंदेखील भरपूर प्रमाणात असतात.
उदाहरणार्थ:
सफरचंदाचं साल – क्वेर्सेटीन (Quercetin) नावाचं अँटीऑक्सिडंट असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं.
बटाट्याचं साल – पोटॅशियम आणि लोह (Iron) चं चांगलं स्रोत आहे.
काकडीचं साल – अविघटनशील फायबर (Insoluble fibre) असतं, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं.
अनेक फळांच्या साली या कोलेस्ट्रोलमुक्त असतात. त्यात साखरेचे, कॅलरीजचे आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते. केळाच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन (tryptophan), एक अमिनो आम्ल असते, ज्याचे रुपांतर आनंद निर्माण करणाऱ्या हॉर्मोन्स सेरोटीन, पोटॅशिअम आणि ल्युटीनमध्ये होते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. त्यात सिट्रुलीन (citrulline) नावाचे अमिनो आम्ल असते, जे रक्त प्रवाह वाढवते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. संत्र्याच्या सालीमध्ये तीन ग्रॅम फायबर आणि फळाच्या मांसल भागापेक्षा तिप्पट व्हिटॅमिन सी असते.
साल काढल्याने पोषणमूल्यं निघून जातात का?
होय. बऱ्याच फळं आणि भाज्यांमध्ये महत्त्वाची पोषणमूल्यं त्यांच्या सालामध्ये किंवा अगदी सालाच्या खालीच असतात.
जेव्हा आपण त्यांची सालं सोलतो, तेव्हा हे फायदेशीर घटक गमावतात.
उदाहरणार्थ :
बटाटे, सफरचंद, गाजर, बीट यांसारख्या भाज्या-फळांच्या सालांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं भरपूर असतात. जर ही सालं स्वच्छ धुतली गेली आणि योग्य पद्धतीने वापरली, तर ती पूर्णपणे सुरक्षित आणि पौष्टिक असतात, म्हणूनच शक्य असल्यास भाज्या व फळं सोलण्याऐवजी स्वच्छ धुवून वापरणं चांगलं ठरतं.
स्वच्छता महत्त्वाची!
भाज्या-फळांची साल सोलण्यामागे लोकांचा एक मोठा हेतू असतो – कीटकनाशकं, जंतू आणि धूळ-मातीपासून संरक्षण.
पण, ही सगळी काळजी साल न काढताही योग्य स्वच्छतेच्या उपायांनी घेता येते.
सालासकट खाणं सुरक्षित ठेवण्यासाठी काही स्वच्छता टिप्स :
नळाखाली धुवा :
सामान्यपणे भिजवण्यापेक्षा वाहत्या पाण्याखाली धुणं अधिक प्रभावी मानलं जातं.
बटाटे, गाजर, आले यांसाठी व्हेजिटेबल ब्रशचा वापर करा.
सौम्य नैसर्गिक क्लिनर वापरा :
१ भाग व्हिनेगर + ३ भाग पाणी या मिश्रणात धुतल्याने फळांवरील रासायनिक लेप आणि कीटकनाशकं निघतात.
बेकिंग सोडा वापरणंही उपयुक्त आहे.
कोरडं करा :
स्वच्छ कापडाने पुसून कोरडं केल्यास ओलसरपणामुळे निर्माण होणारे जंतू टाळता येतात.
शक्य असल्यास सेंद्रिय (ऑर्गेनिक) फळे भाज्या खरेदी करा :
ऑर्गेनिक उत्पादनांमध्ये कीटकनाशकांचा वापर नसतोच
कधी साल सोलणं आवश्यक असतं? (When You Still Have to Peel)
बहुतेक फळं-भाज्यांची साल खाण्यासारखी असते, पण काही वेळा ती काढणंच योग्य ठरतं.
जाडसर, चिकट किंवा कडवट साल असलेले पदार्थ :
उदा. कोहळा (Pumpkin), सुरण (Taro root), कैरी (Raw mango)
यांची साल कडवट असते, त्यामुळे सोलूनच खावं.
ज्यांच्या सालीवर डाग, बुरशी किंवा खराब दिसते अशा फळं-भाज्या सोलाव्यात किंवा गरज असल्यास फेकून द्याव्यात.
आपले आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे.
सालींचा सर्जनशील वापर करा – साल टाकून देऊ नका, वापरा!
फळं-भाज्यांची सालं खाणं शक्य नसलं, तरी त्यांचा सर्जनशील वापर करून तुम्ही आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आणि पर्यावरणपूरक निर्णय घेऊ शकता.
संत्र, मोसंबी किंवा सफरचंदाच्या साली – वाळवून चहा किंवा काढा तयार करण्यासाठी वापरता येतात.
बटाट्याच्या साली – तेलाशिवाय ओव्हनमध्ये भाजून कुरकुरीत क्रिस्प्स तयार करता येतात.
भाज्यांच्या साली (उदा. गाजर, बीट) – सूप किंवा स्टॉकमध्ये ब्लेंड करून चव व पोषण वाढवता येते.
टीप – वरील लेख सिमरन कथुरिया यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. त्या क्लिनिकल डायटीशियन आणि सेलिब्रिटी कोच आहेत)