The Best Way To Eat Your Food: सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणाच्या आधी भूक लागणं, दुपारच्या जेवणानंतर ३-४ तासांनी भूक लागणं ही सामान्य बाब आहे. पण सकाळी पोटभर नाश्ता केल्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते. काही खाल्ल्यानं ही भूक शमते असं नाही तर दिवसभर अशी भूक सारखी लागते. भूक लागली म्हणून खाल्लं जातं. हे असं खाणं वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतं. यामागे अनेक कारणं असू शकतात मात्र त्यातलं एक कारण म्हणजे जेवणाची योग्य पद्धत. तुम्ही योग्य पद्धतीनं जेवत नसाल तर तुम्हाला अशाप्रकारे वारंवार भूक लागणे, वजन वाढणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.
अन्नाशी असलेले आपले नाते केवळ आपण काय खातो यावर अवलंबून नाही तर ते कसे खातो यावर देखील अवलंबून असते. तुम्ही रोज कसे जेवता? टीव्ही पाहत पाहत जेवण करता की कामाचा ताण असताना? हे सर्व घटक आणि बऱ्याच गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. नामा-प्रमाणित आयुर्वेदिक डॉक्टर निधी पंड्या यांनी तृप्तता वाढवण्यासाठी, तृष्णा कमी करण्यासाठी आणि जास्त खाण्यापासून रोखण्यासाठी निरोगी खाण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत.
या निरोगी खाण्याच्या पद्धतीचे फायदे स्पष्ट करताना त्या सांगतात, “योग्य पद्धतीनं खाल्ल्याने तुमच्या शरीरा मदत होईल. फक्त ३ दिवस किंवा आठवड्यातून प्रयत्न करा आणि बदल अनुभवा.” ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी खाली दिल्या.
पोटात जंत झाले असल्यास खाल्ल्यानंतरही पुन्हा भूक लागते. पोटातील जंत सेवन केलेल्या अन्नातून पोषण शोषून घेऊन शरीरात केवळ त्यातील फॅट्स आणि साखरच शिल्लक राहाते. यांसारखी अनेक कारण असली तरीही
सततच खाणं कमी करण्यासाठी आणि जास्त खाण्यापासून रोखण्यासाठी तुमचे अन्न कसे खावे? हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रथम, तुम्ही जेव्हा अन्नाचा एक घास खाता तेव्हा तो नीट चावा त्यानंतर तोंडातला खास संपूर्ण गिळल्यानंतरच दुसरा घास खा. जेवताना मोठ्याने श्वास सोडू नका, तर फक्त हळूवार श्वास सोडा.सुरुवातीला हे आव्हानात्मक असू शकते, परंतु तज्ञांच्या मते, फक्त तीन दिवसांत तुम्हाला सकारात्मक बदल जाणवेल.
जमिनीवर बसून खावे
आयुर्वेदानुसार, नेहमी जमिनीवर बसूनच जेवण केलं पाहिजे. जमिनीवर बसून जेवण केल्याने अन्न चांगल्या प्रकारे पचन होतं. असं केल्यास शरीराला अन्नातील पोषक तत्व चांगले मिळते.
एकदाच भरपूर खाऊ नये
आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक नेहमीच सकाळचा नाश्ता स्किप करतात आणि दुपारी एकत्र भरपूर जेवण करतात. आयुर्वेदात असं सांगण्यात आलं आहे की, कधीही एकाचवेळी भरपूर जेवण करू नये. एकाचवेळी भरपूर खाल्ल्याने पचन तंत्रावर अधिक दबाव पडतो आणि अन्न पचन होण्यास अडचण येते. आयुर्वेदानुसार, नेहमी भूकेपेक्षा थोडं कमी खायला हवं.
जेवण करताना पाणी पिऊ नये
काही लोकांना जेवण करताना सतत पाणी पिण्याची सवय असते. पण असं करणं चुकीचं आहे. आयुर्वेदानुसार, जेवण करताना पाणी प्यायल्याने पचन चांगल्याप्रकारे होत नाही. अशात पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. आयुर्वेदानुसार, जेवणाच्या साधारण ४० मिनिटांआधी आणि जेवण केल्यावर ३० मिनिटांनी पाणी प्यावे.
जेवण झाल्यावर चालणे
आयुर्वेदानुसार जेवण झाल्यावर थोडा वेळ पायी चालावे. जेवण केल्यावर लगेच लेटल्याने किंवा एकाच जागेवर बसून राहिल्याने अन्न व्यवस्थित पचन होत नाही. अशात लठ्ठपणा आणि पचनासंबंधी समस्या