करोना आणि लॉकडाउन अशा दुहेरी संकटात देशातील हातावर पोट भरणारा मजुर भरडला जात आहे. हाताला काम नाही. करोनाची भीती, जेवणाची आबाळ अशा समस्यांना तोंड देत असलेले मजुर घराकडे जात आहे. मात्र, अनेक मजुरांना घरी पोहोचताच आलं नाही. लॉकडाउन लागू झाल्यापासून आतापर्यंत देशात ११९ मजुरांचा वेगवेगळ्या रस्ते अपघात मृत्यू झाला आहे. दुसरीकडं लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत असताना करोनाग्रस्त रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढली आहे. देशातील रुग्णांची संख्या ८६ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत २,७५२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील काही शहरांची स्थिती चिंताजनक आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३० हजार ७६ इतकी झाली आहे. शनिवारी राज्यात १६०६ नवे रुग्ण आढळून आले.