राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (दि. ३ फेब्रुवारी) अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करत असताना १६ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा खुलासा केला. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला त्यांनी विरोध केला. तसेच कोल्हापूरमधील नाभिक समाजाच्या एका तरूणाबरोबर झालेल्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

“नाभिक समाजातील एकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली तर मराठा समाजाने सांगितलं की याच्या दुकानात जायचं नाही. मी सर्व नाभिक समाजातील बांधवांना आवाहन करतो की असा बहिष्कार घालणार असतील तुम्हीही एकाही मराठ्याची हजामत करायची नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Amruta Fadnavis on ladki Bahin Yojana
Amruta Fadnavis :”स्टंटमॅन लोकांनी…” लाडकी बहीण योजनेवरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Jitendra awhad marathi news
कळवा, मुंब्रा, दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च?; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar gets emotional at the Women Gathering The Security Shield of Sisters Around Me
‘माझ्याभोवती बहिणींच्या राख्यांचे सुरक्षा कवच’; महिला मेळाव्यात अजित पवार भावनिक
jitendra awhad on uddhav thackeray
Jitendra Awhad : “महाराष्ट्रात अराजकता माजली आहे”, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त एवढेच लक्षात ठेवा…”

हेही वाचा >> “नाभिक समाजाने मराठ्यांवर…”, भुजबळांच्या त्या आवाहनावर जरांगे पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया

छगन भुजबळांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला. मनोज जरांगे पाटलांसह जितेंद्र आव्हाडांनीही यावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रभर छगन भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानतंर छगन भुजबळांनी आता आपल्या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

छगन भुजबळांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“मी त्या गावाचं नाव घेऊन सांगितलं होतं की एका नाभिक समाजातील बांधवाने ओबीसींच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली तर त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला. मी म्हटलं की नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला तर तुम्ही एकमेकांचे केस कापत बसणार आहात का? ते वक्तव्य जनरल नव्हतं. त्या संबंधित बांधवावर झालेल्या अन्यायासंदर्भात वक्तव्य होतं. हे सर्व नाभिक समाजाला आणि मराठा समाजाला लागू होत नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगेंनी काय टीका केली होती?

“भुजबळ यांचे विचार खालच्या दर्जाचे आहेत. गोरगरीब जनता उपाशी राहावी, ही त्यांची इच्छा दिसते. मग ते स्वजातीय असोत किंवा मराठा समाजाचे असोत. त्यांच्या विचारांना आम्ही सुधारू शकत नाहीत. जे गरीब नाभिक आपला व्यवसाय करतात, त्यांनाही आता व्यवसाय करू द्यायचा नाही, असे भुजबळांचे स्वप्न दिसते”, असं जरांगे पाटील म्हणाले.