Maharashtra News Live Updates, 02 June 2022: राज्यासह देशभरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल भाजपामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच देशात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत असून विजयी गणित जुळवण्यासाठी सर्वच पक्षांचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालेला आहे.
तर दुसरीकडे राज्यातही मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा नेते आशिष शेलार दोन स्वतंत्र पत्रकार परिषदा घेणार असल्यामुळे भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर कोणते आरोप होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
तसेच मान्सूनची चाहूल लागली असून राज्यात काही ठिकाणी मान्सूपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांचीही लगबग सुरु आहे. राज्यात हवामानात बदल झालेला तापमानात घट झालेली पाहायला मिळतेय. या सर्व घडामोडींची माहिती जाणून घ्या एकाच क्लीकवर.
Maharashtra Latest News Updates : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
बंदी असलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आणखी एकाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून अटक केली. त्याला तेथील स्थानिक न्यायालयाने प्रवासी कोठडी मंजूर केली असून, त्याला लवकरच पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एटीएसचे पथक त्याला पुण्याकडे घेऊन पुण्याकडे निघाले आहे. यापूर्वी दापोडी परिसरातून अटक केलेल्या मोहम्मद जुनैद याच्या संपर्कात तो होता. वाचा सविस्तर बातमी...
जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असून राष्ट्रवादीची मागणी आहेच शिवाय तशी भूमिकाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पक्षाच्यावतीने सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...
कोल्हापूरमधील उंचगाव येथील रुग्णाच्या मृत्यूला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आज (गुरुवार) भर पावसात सीपीआर जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका पासेपारधी समाजाने घेतली आहे. वाचा सविस्तर बातमी...
औरंगाबादमधील खोकडपुरा भागातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात पदवी परीक्षेच्या आजच्या (गुरुवार) प्रश्नपत्रिकेदरम्यान, एकाच बाकावर तीन-चार परीक्षार्थींना बसवण्यात आले होते. अनेक परीक्षार्थीं सामूहिक कॉपी केल्यासारखे परस्परांची उत्तरे पाहून लिहित असल्याचा प्रकार उघडकीस आला. वाचा सविस्तर बातमी...
कोल्हापूरसह जिल्ह्याला आज(गुरुवार) सायंकाळी आलेल्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव, जोरदार पाऊस यामुळे अवघे कोल्हापूर शहर काही काळातच जलमय झाले होते. झाडे कोसळल्याने विजेचा व्यत्यय, जलकोंडी, वाहतूक अडथळा यासारख्या अडचणी उद्भवल्या. पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले गेले. वाचा सविस्तर...
सांगली बाजार समितीमध्ये प्राथमिक स्तरावर होणारे हळद सौदे करमुक्त असतील, असा निर्णय जीएसटी लवादाने आज (गुरुवार) दिला. हळद हा शेतीमाल असल्याचे लवादाने मान्य केले असून या प्रकरणी हळदीचे अडत व्यापारी मेसर्स एन. बी पाटील पेढीने लवादाकडे अपिल केले होते. वाचा सविस्तर बातमी...
सोलापूरचे रद्द झालेले शाळा न्यायाधीकरण पुण्याला न हलविता सोलापुरातच कायम राहणार आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर हे शाळा न्यायाधीकरण पुढील आदेश होईपर्यंत सोलापुरातच राहणार असल्याचे शालेय शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर बातमी...
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटी वसूली प्रकरणी ५९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
सुरक्षा व्यवस्था हटवल्यानंतर पंजाबी गायक तसेच काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली. याच कारणामुळे पंजाबमधील भगवंत मान सरकारवर चौफेर टीका केली जात आहे. असे असतानाच आता पंजाब सरकार ज्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती त्या ४०० महत्त्वाच्या व्यक्तींना पुन्हा एकदा सुरक्षा पुरवणार आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवर बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यानंतर आज(गुरुवार) त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. या निर्णयानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. वाचा सविस्तर बातमी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र सैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी एक सूचना केलेली आहे. भोंग्यांच्या विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे, त्यासाठी कामाला लागा असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यासाठी राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे एक पत्र पाठवले असून, हे पत्र मनसैनिकांनी घराघरात पोहचवावे असे सांगितले आहे. वाचा नेमकं काय लिहिलं आहे पत्रात
शेतकरी, शेतमजुरांच्या हिताचे कायदे करण्यासाठी आतापर्यंत आपण निवडून पाठवलेले पक्षप्रतिनिधी बदल करू शकले नाहीत. महापालिका, जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य निवडून आल्याशिवाय आमदार, खासदारकीची वाट मोकळी होऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख धनंजय पाटील काकडे यांनी दिली. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
औरंगाबादमधील पाणी पुरवठ्याच्या मुद्य्यावरून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत निर्देश दिले. “मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे.” असे त्यांनी म्हटले. वाचा सविस्तर वृत्त...
“करोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल.”, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. वाचा सविस्तर बातमी...
साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवर बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यानंतर आज(गुरुवार) त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. वाचा सविस्तर बातमी...
राज्यात करोनाच्या संख्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या संख्येबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ६ वाजता कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे.
पक्षश्रेष्ठींवर नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी आज गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसला रामराम ठोकल्यावर पटेल भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या.
आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे विविध प्रकारच्या दुचाकी आहेत असे मुलींना दाखवून त्यांना आकर्षित करायचे. त्यांना दुचाकीवर घेऊन मौजमजा करत फिरायचे. नंतर दुचाकी विकून मजा करायची अशी सवय जडलेल्या टिटवाळ्यात फुलांचे हार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका तरूणाला महात्मा फुले पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गु्न्ह्यात अटक केली आहे. त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटार सायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
मुंबई आणि परिसरात जागा उपलब्ध नाहीत त्यामुळे आता डोंबिवलीपल्याड अंबरनाथमध्ये उपलब्ध २०० एकर जागा म्हाडा विकत घेणार असून त्यावर म्हाडाची सर्वात मोठी वसाहत उभारण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ही माहिती दिली. म्हाडाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प असेल असेही आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करण्याआधीच पटेल यांनी पक्षवाढीसाठी मोठी मोहीम हाती घेणार असल्याची माहिती दिली आहे. सविस्तर बातमीसाठी येथे क्लीक करा
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावं अशी मागणी पडळकरांनी पत्रातून केली आहे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा असंही पडळकर पत्रात म्हणाले आहेत. पडळकरांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत सभा घेतल्याबद्दल शरद पवारांवर निशाणा साधला.
अमेरिकेत टेक्सासमध्ये गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच ओक्लाहोमा येथे एका वैद्यकीय इमारतीत गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरदेखील ठार झाला असून पोलीस त्याची ओळख पटवत आहेत.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर १ जून रोजी लग्नबंधनात अडकला. त्याने आपली प्रेमिका जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधली आहे. पाहा फोटो
२०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मुख्य टीकाकार आणि पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी हार्दिक पटेल यांनी सकाळी ट्विट करत आपण देशसेवेच्या उदात्त कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं म्हटलं आहे.
जाणून घ्या प्रत्येक घडामोड