सातारा : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत तीन लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी पुणे विभागातील एक लाख सात हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार रुपये, नाशिक विभागातील एक लाख पाच हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील ‘अवकाळी’साठी ३३७ कोटी ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख आठ हजार रुपये, कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या चार हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी नऊ कोटी ३८ लाख २४ हजार रुपये, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदतीचा समावेश आहे.