बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे आज सगळं काही आहे. पण त्यांच्यावर अशी वेळ देखील आली होती, जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. हा तो काळ होता जेव्हा अमिताभ यांच्यावर आर्थिक संकट आलं होतं. याचा खुलासा अमिताभ यांचा मुलगा आणि अभिनेता अमिताभ बच्चनने एका मुलाखतीत केला आहे.

अभिषेकने ‘द रणवीर शो’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकने त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकाटा विषयी सांगितले. अमिताभ यांनी त्यांच्याइथे काम करणाऱ्या लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते जेणे करून त्यांच्या कुटुंबाला जेवण मिळेल. “कुटुंबाच्या आजुबाजुला रहायला मला आवडतं. माझ्या वडिलांना रात्रीचे जेवण कसे मिळेल हे माहित नसताना, मी बोस्टनमध्ये राहू शकत नव्हतो. माझ्या वडिलांना आमच्या इथे कामाला असणाऱ्या लोकांकडून पैसे उधारीवर घ्यावे लागत होते, जेणे करून ते आम्हाला जेवण देऊ शकतील. त्यामुळे बोस्टनमध्ये न राहता त्यांच्या जवळ राहण्याची गरज आहे असे मला वाटले,” असे अभिषेक म्हणाला.

Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

पुढे अभिषेक म्हणाला, त्याने अमिताभ यांना फोन केला आणि कॉलेज सोडून त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा सांगितली. हे ऐकल्यानंतर अमिताभ भावूक झाले होते. त्याआधीच अभिषेकने अमिताभ यांना त्याला अभिनेता होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिषेक भारतात परतला.

नुकतेच केबीसीचे १ हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. त्यावेळी अमिताभ हे भावूक झाले आणि त्यांनी केबीसीची ऑफर कशी स्विकारली ते सांगितले होते. केबीसीची ऑफस जेव्हा त्यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. त्यांना चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हते. या कारणामुळे त्यांनी केबीसी करण्यासाठी होकार दिला होता.