बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे आज सगळं काही आहे. पण त्यांच्यावर अशी वेळ देखील आली होती, जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. हा तो काळ होता जेव्हा अमिताभ यांच्यावर आर्थिक संकट आलं होतं. याचा खुलासा अमिताभ यांचा मुलगा आणि अभिनेता अमिताभ बच्चनने एका मुलाखतीत केला आहे.

अभिषेकने ‘द रणवीर शो’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकने त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकाटा विषयी सांगितले. अमिताभ यांनी त्यांच्याइथे काम करणाऱ्या लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते जेणे करून त्यांच्या कुटुंबाला जेवण मिळेल. “कुटुंबाच्या आजुबाजुला रहायला मला आवडतं. माझ्या वडिलांना रात्रीचे जेवण कसे मिळेल हे माहित नसताना, मी बोस्टनमध्ये राहू शकत नव्हतो. माझ्या वडिलांना आमच्या इथे कामाला असणाऱ्या लोकांकडून पैसे उधारीवर घ्यावे लागत होते, जेणे करून ते आम्हाला जेवण देऊ शकतील. त्यामुळे बोस्टनमध्ये न राहता त्यांच्या जवळ राहण्याची गरज आहे असे मला वाटले,” असे अभिषेक म्हणाला.

Loksatta chaturang article about children who think they own their parents money
सांदीत सापडलेले…! मालक कोण?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Name Change After Marriage
लग्नानंतर नाव बदलायचं नव्हतं, पण सासरच्यांनी केला विरोध अन्…
Man putting hand inside crocodiles mouth crocodile shocking video
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
Engineer turned farmer
Success Story: इंजिनिअर झाला शेतकरी… आरोग्यासाठी आयटी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून केली शेती; वर्षाला लाखोंची कमाई
Lumps keep growing in your furniture at home
घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
religious reforms, festivals, celebrations
अन्य धर्मीयांनी बदलावे मग आम्ही बदलू, यासारखा अविवेक नाही!
Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?

पुढे अभिषेक म्हणाला, त्याने अमिताभ यांना फोन केला आणि कॉलेज सोडून त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा सांगितली. हे ऐकल्यानंतर अमिताभ भावूक झाले होते. त्याआधीच अभिषेकने अमिताभ यांना त्याला अभिनेता होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिषेक भारतात परतला.

नुकतेच केबीसीचे १ हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. त्यावेळी अमिताभ हे भावूक झाले आणि त्यांनी केबीसीची ऑफर कशी स्विकारली ते सांगितले होते. केबीसीची ऑफस जेव्हा त्यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. त्यांना चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हते. या कारणामुळे त्यांनी केबीसी करण्यासाठी होकार दिला होता.