गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांच्याबरोबर काम करताना त्यांना आलेल्या अनुभवावर भाष्य केले आहे. अभिजीत यांनी रेहमान यांच्याबरोबर फक्त एकाच गाण्यावर काम केले आहे. ‘ऐ नाजनीन सुनो ना’ या गाण्यासाठी त्यांनी एकत्र काम केले आहे. अभिजीत यांनी ए आर रेहमान यांच्या रात्री काम करण्याच्या सवयीवरही भाष्य केले आहे.

‘बॉलीवूड ठिकाणा’ला दिलेल्या मुलाखतीत, अभिजीत यांना त्यांनी ए आर रेहमान यांच्याबरोबर फक्त एकदाच का काम केले याबद्दल विचारले . त्यावर ते म्हणाले, “त्या काळात मला सर्व मोठ्या संगीतकारांकडून फोन येत होते. अनु मलिक, आनंद-मिलिंद, जतिन-ललित सर्वजण फोन करत होते. मी सतत डबिंगमध्ये व्यस्त होतो. मी रेहमान यांना भेटण्यासाठी गेलो आणि मला हॉटेलमध्ये थांबून ठेवण्यात आले.”

chhaava movie marathi writer kshitij patwardhan writes aaya re toofan song
मराठमोळ्या लेखकाने लिहिलंय ‘छावा’ सिनेमाचं गाणं! ए आर रेहमानसह पहिल्यांदाच एकत्र काम; म्हणाला, “शब्दरूपी सेवा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”

हेही वाचा…एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स

ते पुढे म्हणाले, “मी ठरवले की मी थांबणार नाही आणि मी सकाळी रेकॉर्डिंग करेन. मी घरी गेल्यानंतर मला रात्री २ वाजता स्टुडिओतून फोन आला आणि त्यांनी मला गायनासाठी बोलावले. मी त्यांना सांगितले की, मी झोपलो आहे. मी सकाळी गेलो, पण तिथे ते नव्हते. त्यांना नियमित वेळेत काम करण्याची सवय नाही. मला व्यवस्थित पद्धतीने काम करायला आवडते. आता क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही म्हणाल की रात्री ३:३३ वाजता रेकॉर्डिंग होईल, तर मला हे पटत नाही.”

अभिजीत यांनी सांगितले की, “त्या दिवशी स्टुडिओत रेहमान यांचे सहाय्यक होते आणि तेच सगळं काम बघत होते. माझ्या रूममधील एअर-कंडिशनिंगमुळे मला सर्दी झाली होती. पण त्यांनी आग्रह केला की मी गाऊन दाखवावे. मी अनेक सुपरफ्लॉप चित्रपटांसाठी हिट गाणी गायली आहेत आणि हे त्यापैकी एक होतं. कोणीही तो चित्रपट पाहिला नाही. गाणं रेहमानचं आहे असं सांगून त्यांनी रेहमान यांना श्रेय दिले.” अभिजीत पुढे म्हणाले, “मी रेहमान यांना विचारत राहिलो, पण मला ठाम उत्तर मिळालं नाही. एखादा कलाकार अशा गोष्टींमुळे मोठा किंवा लहान होत नाही… मला सांगण्यात आलं की, मी त्यांची वाट बघून त्यांना भेटून नंतर जावे . पण मी त्यांना सांगितले की, माझी आधीची काही कामे आहेत.”

हेही वाचा…सलमान खानने सोनू सूदला दिली होती ‘दबंग २’ची ऑफर, अभिनेत्याने ‘या’ कारणामुळे नाकारला होता चित्रपट; म्हणाला…

अभिजीत यांनी ‘रंगीला’ चित्रपटासाठी प्लेबॅक करण्याची संधी मिळणार होती पण ते या सिनेमात का गायन करू शकले नाही यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “मला सांगण्यात आले की गाणे बदललं गेलं आहे आणि उदितने (उदित नारायण यांनी) आधीच पात्रासाठी गायलं आहे, त्यामुळे तुमचे व्होकल्स वेगळ्या पद्धतीने वापरले जातील. तेव्हा मला कळलं की हे संगीतासाठी योग्य ठिकाण नाही. ”

Story img Loader