कपूर घराण्याचा वारसा पुढे नेणारी अन् सध्याच्या काळातील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर ही कायम चर्चेत असते. इंडस्ट्रीमधील गॉसिप गर्ल अशी ओळख असणारी करीना ही आता लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. याआधी आमिर खानबरोबरचच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना झळकली, चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला परंतु करीनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

करीनाने नुकतीच ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये करीनाने चित्रपटक्षेत्रातील तिचा आजवरचा प्रवास अन् तिला आलेले अनुभव याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये करीनाला बरेच प्रश्न विचारले गेले. यापैकी रॅपिड फायर राऊंडदरम्यान तिला प्रश्न विचारण्यात आला की आपल्या कुटुंबाबरोबर तिला भारताबाहेरील कोणत्या शहरात राहायला आवडेल?

आणखी वाचा : सैफ अन् आपल्या वयातील अंतरावर करीना कपूरचं हटके उत्तर; म्हणाली “तो आजही तितकाच हॉट…”

यावर उत्तर देताना करीना म्हणाली, “सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत, पण खरं सांगायचं झालं तर मला जितकी सहजता आणि मोकळेपणा मुंबईत राहताना मिळतो तसं इतर ठिकाणी मिळणं अशक्य आहे. या शहरात मला फार सुरक्षित वाटतं अन् मला मानसिक शांतता फक्त याच शहरात मिळते. त्यामुळे दुसरीकडे कुठे राहायचा विचारही करू शकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीना लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात करीनाबरोबर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीनाच्या वाढदिवशी म्हणजेच २१ सप्टेंबरला ‘जाने जान’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.