‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपेकी एक असलेला प्रसाद जवादेचा प्रवास रविवारी संपला. प्रसादने घरातून एक्झिट घेताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रसाद हा ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होता. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रसादने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’च्या घरातील त्याच्या प्रवासाचा उलगडा केला आहे. “माझ्यासाठी हा प्रवास खूप छान होता. सुरुवातीच्या भांडणापासून ते घरात झालेल्या राड्यापर्यंत. काही लोकांबरोबर चांगलं कनेक्शन जुळलं. पण मध्यंतरी मी घरात एकटा पडलो होतो. प्रत्येक नॉमिनेशन प्रकियेत मला नॉमिनेट केलं गेलं. मला वाटतं स्ट्रॉंग स्पर्धकालाच नॉमिनेट केलं जातं. सगळ्या नॉमिनेशन प्रक्रियेतून वाचलो. पण शेवटचं नॉमिनेशन हुकलं. या सगळ्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील”, असं प्रसाद म्हणाला.

हेही वाचा>> “मला विजेता…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादेचं मोठं वक्तव्य

प्रसादने या व्हिडीओमध्ये अमृता देशमुखबरोबरच्या नात्याबाबतही खुलासा केला आहे. “अमृता एक जवळची व्यक्ती झाली आहे. आम्हाला न बोलता बऱ्याचशा गोष्टी कळायच्या. आतापर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींपैकी ती एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. आमचं नातं हे निश्चितच मैत्रीच्या पलीकडे आहे”, असंही प्रसाद म्हणाला.

हेही वाचा>> “…म्हणून मी गरोदर असल्याचं सगळ्यांपासून लपवलं”, आलिया भट्टचा खुलासा

हेही वाचा>> “जवळ येऊ नकोस…”, रितेश देशमुखशी फोनवर बोलत असताना जिनिलीयाबरोबर नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात आणखी एक सदस्याचा प्रवास संपुष्टात येणार आहे. लवकरच या पर्वाचा विजेता मिळणार आहे. येत्या ८ जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.