मराठी मालिका, चित्रपट तसंच रिअॅलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेलं एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधवने. तिने मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाने चर्चेत राहणारी रुचिरा सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसंच अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर तिची मतं व्यक्त करताना दिसते.
अशातच रुचिराने लग्नातील ‘कन्यादान’ या विधीबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रुचिराने ‘कन्यादान नाही तर कन्या मान होऊ शकतो’ असं मत व्यक्त केलं आहे. जयंती वाघधरेच्या आम्ही असं ऐकलंय या पॉडकास्टमध्ये रुचिराने कन्यादानबद्दल तिची स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच स्त्रिया नवीन जीवाला जन्म देत असूनही त्या जीवाला स्त्रियांची ओळख मिळत नसल्याबद्दलही रुचिराने तिचं मत व्यक्त केलं.
याबद्दल रुचिरा असं म्हणाली, “कन्येचं दान नाही होऊ शकत, कन्येचा फार फार मान होऊ शकतो. मी याबाबतीत खूप ठाम आहे. तुम्ही प्रथा करा. पण त्याला कन्यादान म्हणू नका. देवानेच मला निर्माण केलं आहे आणि आई-वडिलांनी मला जन्म दिला. जसं सगळ्यांना जन्माला घातलं जातं, तशी मी एक मुलगी आहे. त्यामुळे मला एका वस्तूचं दान होतं. तसं वागवलं जाऊ नये.”
यापुढे रुचिरा असं म्हणते, “मुलीला तिची ओळख बदलायला लागणं ही गोष्ट कुठून आली? आपण याबद्दल भाग्यवान आहोत की, स्त्रिया पालनपोषण करतात. म्हणजे दुसरा जीव तिच्या शरीरात राहतो. तिच्या शरीराद्वारे तो जन्माला येतो. त्याचा त्रास तिला होतो. तर मग त्या जीवाला त्या स्त्रीचं नाव का नाही? मी जर रुचिरा जाधव आहे मग माझी मुलगी किंवा मुलगा… जे काही भविष्यात असेल तर तो/ती जाधव का नाही.”
यापुढे रुचिरा असं म्हणते, “मुलीला तिची ओळख बदलायला लागणं ही गोष्ट कुठून आली? आपण याबद्दल भाग्यवान आहोत की, स्त्रिया पालनपोषण करतात. म्हणजे दुसरा जीव तिच्या शरीरात राहतो. तिच्या शरीरात तो जन्माला येतो. त्याचा त्रास तिला होतो. तर मग त्या जीवाला त्या स्त्रीचं नाव का नाही? मी जर रुचिरा जाधव आहे मग माझी मुलगी किंवा मुलगा… जे काही भविष्यात असेल तर तो/ती जाधव का नाही.”
दरम्यान, रुचिराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘३६ गुणी जोडी’ या मालिकांत काम केलं आहे. तसंच ती ‘लकडाऊन बी पॉसिटीव्ह’, ‘बाबू’, लव्ह लफडे’, ‘सोबत’ या मराठी चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तसंच तिने ‘बिग बॉस मराठी’मध्ये ही सहभाग घेतला होता. सध्या ती सध्या स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत काम करत आहे.