Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अश्विनच्या बर्थडे सेलिब्रेशनचा सीक्वेन्स चालू आहे. अश्विनचा वाढदिवस असल्याने सायली-अर्जुन त्याच्यासाठी रात्रीच रव्याचा केक बनवतात, संपूर्ण घर सजवतात…आपल्या कुटुंबीयांनी दिलेलं हे छान सरप्राइज पाहून अश्विन प्रचंड आनंदी होतो.

कल्पना, प्रताप, अर्जुन-सायली सगळेजण मिळून अश्विनचा वाढदिवस जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल याचा विचार करत असतात. पण, प्रियाला हे सगळं पटत नसतं. ती फक्त अश्विनसमोर चांगलं वागण्याचा दिखावा करत असते. आता लवकरात लवकर घरच्यांसमोर प्रियाचा खोटेपणा उघड करायचा असा निश्चय सायलीने केलेला असतो. यानुसार सायली जेवणाची सगळी जबाबदारी गोड बोलून प्रियावर सोपवते. अगदी प्रताप सुद्धा याबद्दल सायलीचं अर्जुनसमोर कौतुक करतात.

प्रियाला काही केल्या जेवण बनवणं झेपत नाही. किचनमध्ये सर्वत्र तिने पसारा करून ठेवलेला असतो. इतक्यात कल्पना तिच्या मदतीला येते. कल्पना आल्यावर प्रिया पुन्हा एकदा तिच्या मोबाईलमध्ये रेसिपी बघत खीर बनवण्याचं नाटक करते. शेवटी तिला काहीच बनवणं शक्य होत नाही. प्रियाची फजिती झालेली पाहून अर्जुन प्रचंड आनंदी होतो.

मात्र, अश्विनचा वाढदिवस नीट साजरा झाला पाहिजे हा विचार करून आता सायली कल्पनाला मदत करण्यासाठी किचनमध्ये जाणार आहे. या दोघीजणी सगळा राग-रुसवा विसरून अश्विनसाठी जेवण बनवणार आहेत. हे सगळं पाहून अर्जुन प्रचंड आनंदी होतो. रात्री सुभेदारांच्या घरात अश्विनच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. यावेळी सर्वात आधी कल्पना लेकाचं औक्षण करते आणि त्याला गिफ्ट देते.

प्रियामुळे अश्विन-अर्जुनच्या नात्यात दुरावा आलेला असतो. पण, या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघे भाऊ पुन्हा एकत्र येणार आहेत. अर्जुन अश्विनला खास भेटवस्तू देणार आहे. ती भेटवस्तू असते बालपणीची खेळण्यातील बस…आपल्या मोठ्या भावाचं प्रेम पाहून अश्विनला अश्रू अनावर होतात. अर्जुन आणि अश्विन दोघेही एकमेकांन मिठी मारून रडू लागतात. हे पाहून सायली प्रचंड खूश होते. तर, प्रियाचा चेहरा पूर्णपणे पडतो.

View this post on Instagram

A post shared by tharal_tar_mag_ (@tharal_tar_mag_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर, प्रियाला अर्जुन-अश्विनमध्ये आणखी दुरावा निर्माण करायचा असतो. पण, तिचा हा नवीन प्लॅन देखील फसणार आहे. आता प्रिया पुढे काय करणार? अर्जुन-अश्विनमधील दुरावा मिटल्यामुळे प्रियाच्या अडचणी वाढणार का? हे ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.