लोकसत्ता टीम
वाशीम: जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, वाशीम, मानोऱ्यासह कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांसह मालेगाव तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
आणखी वाचा- अवकाळीचा रब्बी पिकांना तडाखा; संत्र्यासह गहू, हरभऱ्याची हानी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वाशीम जिल्ह्यात ६ मार्च रोजी सायंकाळी व रात्री अनेक भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गहू पिकाची नासाडी झाली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आला आहे. तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे अवकाळी पावसाने संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.