संजय बापट

नागपूर: उद्योगाच्या नावाखाली जमीनी घेऊन तेथे उद्योग सुरू न करणाऱ्यांच्या जमीनी परत घेण्याचा राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या(एमआयडीसी) मोहिमेत एकाही उद्योजकाने प्रतिसाद न दिल्याने महामंडळाच्या याचा फज्जा उडाला आहे. त्यातच महामंडळाने काही बडय़ा कंपन्यांवर मेहेरनजर दाखविल्यामुळे मंडळाचे कोटय़ावधींचे नुकसान झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) ठेवला आहे.

MHADA Pune Board, computerized lottery, 4850 flats, State Housing Minister Atul Save, Collector Dr. Suhas Diwase, Deputy Chief Executive Officer Anil Wankhede, Monitoring Committee, affordable housing, transparent process, Pune Housing and Area Development Board, upcoming lottery, official websites, pune news,
घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली ‘ही’ घोषणा
Thane Municipal Commissioner information about the measures to solve the traffic jam
मुख्यमंत्र्यांचे शहर अडकले वाहतूक कोंडीत, पालिका अधिकाऱ्यांना जोरबैठका सुरू
Palghar Worker Fatally Stabbed, Altercation, tarapur BARC, INRP Construction Site, Security Concerns, palghar news,
तारापूर बीएआरसी केंद्राच्या परिसरात खून करण्याचा प्रयत्न, स्थानिक कंत्राटी कामगार गंभीर
ashima goyal on raising farm productivity
कृषी उत्पादकता वाढविण्यावर केंद्राने भर द्यावा; रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्यांचा सरकारला सल्ला
Export of 3397 tonnes of mangoes from the facilities of Panaan
इंग्लंड, अमेरिकेत हापूस, केशर, बैगनपल्लीला पसंती!
farmers Member of sugar factory raise Slogan against MLA Prakash Abitkar
‘बिद्री’च्या सभासदांचा भर पावसात मोर्चा;आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
onion, Nashik, Central Agriculture Committee,
लोकसभा निकालानंतर प्रथमच केंद्रीय कृषी समिती नाशिक दौऱ्यावर, सरकारी कांदा खरेदीतील त्रुटी शोधण्यावर लक्ष
thane ghodbunder rmc project marathi news
घोडबंदरच्या भरवस्तीतील आरएमसी प्रकल्प सुरूच, आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त; संबंधित यंत्रणेचे होतेय दुर्लक्ष

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एमआयडीसीच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आलेला ‘कॅग’चा अहवाल विधिमंडळात मांडला. महामंडळाने एकीकडे मोठय़ा उद्योगांना झुकते माप देतानाच ट्रान्स ठाणे क्रीक(टीसीसी) औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांनाही नियमबाहय संरक्षण दिल्याचे ताशेरे ओढले आहेत. राज्यातील विविध एमआयडीसीमध्ये अनेक उद्योजकांनी कारखाना उभारण्यासाठी महामंडळाकडून सवलतीमध्ये जागा घेतली. मात्र त्याचा वापरच केलेला नाही. काही ठिकाणी तर छोटा कारखाना सुरू करून अन्य जागा तशीच ठेवल्याचे तर काही ठिकाणी कारखाने बंद पडल्याने जमीनी तशाच पडून आहेत. ही विनावापर किंवा अतिरिक्त जमीन एमआयडीसीच्या नियम ४२अ नुसार परत घेण्याचा अधिकार महामंडळास आहे. या नियमाचा वापर करीत महामंडळाने उद्योजकाने वापर न केलेली किंवा अतिरिक्त जमीन परत घेण्याचा निर्णय जून २०१७ मध्ये एमआयडीसीने घेतला. त्यानुसार दिलेल्या मुदतीत भूखंड परत करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महामंडळाने दिला होता. मात्र या धोरणाला एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा >>>“विरोधकांकडून विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा नाहीच”, फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले, “मध्यंतरी एक सरकार…”

दर निश्तित करण्याचे धोरण अयोग्यमहामंडळाचे जमिनीचे दर निश्चित करण्याचे धोरणही योग्य नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक प्रकरणात एमआयडीसीने आपल्याच धोरणांच्या (ई-बिडिंग, प्रतीक्षा यादी, प्राधान्य आणि विस्तार) विरुद्ध जात अपात्र ठरणाऱ्यांनाही भूखंडाचे वाटप केले. काही ठिकाणी भूखंड उपलब्ध नसतानाही वाटपकर्त्यांना जमिनीच्या वाटपासाठी पत्र देण्यात आली. तर काही ठिकाणी वन जमीनीवरील भूखंड उद्योगांसाठी देण्यात आल्यामुळे कालांतराने सबंधितांना सव्याज नुकसान भरपाई देण्याची वेळ महामंडळार आली. भूखंडाचा विकास न करणाऱ्या किंवा वापर परवाना न घेणाऱ्या म्हणजेच मुदतीत उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योगकांवर देखरेख ठेवण्यााठी महामंडळाकडे कसलीही यंत्रणा नसून अनधिकृत सब-लीज आणि वाटप केलेल्या भूखंडांच्या वापरात बदल, देखरेखीसाठी यंत्रणेचा अभाव, अतिक्रमण हटवणे आणि अतिक्रमणधारकांना जमिनीचे अनियमित वाटपाबाबतही ठपका ठेवला आहे.

अतिरीक्त जागा परत नाही

एकाही भूखंडधारकाने कारखान्याच्या जागेत अतिरिक्त ठरलेली किंवा अद्याप वापरत न केलेली एक इंचही जमीन एमआयडीसीला परत केली नाही. एकटय़ा ट्रान्स ठाणे क्रीक(टीसीसी) या क्षेत्रातील ३,२८४ भूखंडापैकी केवळ सात टक्के म्हणजेच २३१ भूखंडाचा पूर्ण वापर होत असून उर्वरित ३,०५३ भूखंडाची ६०.५१ लाख चौरस मीटर जमीन वापराविना पडून आहे.अशाच प्रकारे राज्यातील अन्य १५८ औद्योगिक क्षेत्रामध्ये ३४ हजार ५७४ भूखंडधारकांपैकी केवळ पाच टक्के म्हणजेच १६८७ कारखानदारांनी त्यांना मिळालेल्या जमिनीचा जास्तीत जास्त वापर केला आहे. तर तब्बल ३२ हजार ८८७ भूखंडधारकांकडे १२.२५ कोटी चौरस मीटर जमीन विनावापर पडून असल्याची धक्कादायक बाब कॅगने समोर आणली आहे.