scorecardresearch

Premium

राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता

राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

intensity rain increase Maharashtra next 48 hours
राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर: देशभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरीही महाराष्ट्रात मात्र येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे मुंबईसह उपनगरात आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी आणखीच पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

Monsoon return journey from 10th October
Monsoon Update: मान्सूनच्या परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून
Monsoon Maharashtra
मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला! देशाच्या काही राज्यांमधून परतीची वाट…
rainfall Maharashtra
राज्यात पावसाचा जोर वाढणार, १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान अंदाज
Maharashtra Monsoon Latest Update, heavy rain, prediction, Maharashtra, low pressure area, Bay of bengal
Weather Update: राज्यात मोसमी पाऊस शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय!; हवामान विभागाचा अंदाज

हेही वाचा… कंत्राटी भरती विरोधात आंदोलन आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका

हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी, तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा… चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू तस्करी जोरात

दरम्यान, परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा भारतातील मान्सूनचा कालावधी संपला असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The intensity of rain will increase in maharashtra in the next 48 hours rgc 76 dvr

First published on: 02-10-2023 at 13:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×