लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: जळगाव, मनमाड – भुसावळ विभाग रेल्वे पोलीस, सुरक्षा दल आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त कारवाईमुळे दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून होणारी ५९ बालकांची तस्करी रोखण्यात यश आले आहे. भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बालकांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
बिहारमधील दानापूरहून निघालेल्या पुणे
हेही वाचा… शासन-सार्वजनिक-खासगी भागीदारीवर नाशिकचा विकास शक्य; ‘मी नाशिककर’तर्फे भविष्यकालीन आराखडा सादर
भुसावळ येथे मिळालेल्या ३० बालकांना जळगाव येथील बालसुधार गृहात पाठविण्यात आलमनमाडहून रवाना करण्यात आलेली २९ बालके बुधवारी सकाळी नाशिक येथे आली. त्यांना बालकल्याण समितीपुढे उभे करण्यात आले. त्यांचे समुपदेशन करुन नेमके काय झाले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
हेही वाचा… अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून सांगली
रेल्वे पोलिसांनी भुसावळ आणि मनमाड येथे केलेल्या कारवाईत ५९ बालके सापडली आहेत. नाशिक येथे आलेल्या या बालकांशी बाल कल्याण
समितीचे अधिकारी, सदस्य संवाद साधत आहेत. हा प्रकार कसा घडला, कारणे आदींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. – सुवर्णा वाघ (रेल्वे पोलीस, नाशिक)
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.