उरण : जेएनपीए बंदर ते मुंबईदरम्यानची वातानुकूलित ईबोट सेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे जेएनपीए ते मुंबई हे अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करता येणार आहे. जेएनपीए ते गेटवे ऑफ इंडियादरम्यान सुरू आहे. पावसाळ्यात सध्या ही सेवा जेएनपीए ते भाऊचा धक्का दरम्यान आहे. या प्रवासाला एक तास लागत होता मात्र नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या सेवेमुळे तासभराचा हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत करता येणार आहे.

जेएनपीए बंदर ते मुंबईदरम्यानची वातानुकूलित ईबोट सेवेमुळे उरणकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत. जेएनपीए बंदर ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील लाकडी बोटींच्या प्रवासाला ब्रेक लावण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला आहे. येत्या नवीन वर्षापासून बंदरातून मुंबईत प्रवाशांना घेऊन जाण्या-येण्यासाठी अद्ययावत स्पीड बोटी धावणार आहेत. या प्रदूषणविरहित स्पीड बोटीचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. या सागरी मार्गाने जेएनपीएचे कामगार, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी वापर करता येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरून बोटी सुरू असतात.

प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या सोयीसुविधांनी सुसज्ज स्पीड बोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षाभरापूर्वीच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्यासाठी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून सोमवारपासून ही सेवा सुरू होणार आहे. – बाळासाहेब पवार, उपसंरक्षक कॅप्टन, जेएनपीए

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपणार

ईबोटी सुरू करण्यासाठी माझगाव डॉक व जेएनपीएकडून पाच महिन्यांपासून तारखा जाहीर करण्यात येत होत्या. मात्र, स्पीड बोट सेवा सुरू करणे जेएनपीए-माझगाव डॉकला शक्य झाले नाही. आता माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड जेएनपीएदरम्यान सलग दहा वर्षांऐवजी प्रत्येक वर्षासाठी करार करण्यावर एकमत झाले आहे. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीकडून जेएनपीए-मुंबई या सागरी मार्गावर प्रवाशांसाठी स्पीड बोट सेवा सुरू होणार आहे. याआधी लाकडी बोटींसाठी १५० रुपये इतकी परतीच्या तिकीट दराची आकारणी केली जात होती. मात्र ई स्पीड बोटींसाठी अधिक तिकीट दर आकारण्यात येणार आहे.